शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 14:26 IST

भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता अटारी सीमेवरील तिरंग्यापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च महिन्यात भारताकडून भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. भारताने ध्वज उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली होती. इतकंच नाही तर भारत हेरगिरी करत असल्याचा आरोप करत कांगावा करण्यासही सुरुवात केली होती.

आणखी वाचा - 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

राज्यातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ध्वजस्तंभ उभा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार आहे तेथील झाडे कापली जात आहेत. जर का सर्व काही नियोजनप्रमाणे पार पडलं तर हा जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल. 

 

याचवर्षी 5 मे रोजी भारताने 360 फूटावर तिरंगा उभारतला, मात्र जोरात वाहणा-या वा-यामुळे काही दिवसातच तो फाटला होता, ज्यामुळे तो बदलावा लागला होता. तिरंग्याची काळजी घेताना अधिका-यांना अनेक समस्या जाणवत आहेत. आतापर्यंत पाचवेळा तिरंगा बदलावा लागला आहे. ध्वजस्तंभालाही अद्याप तिरंग्याचा रंग देण्यात आलेला नाही. भारत - पाकिस्तान सीमारेषेवर बीटिंग रीट्रीट कार्यक्रमादरम्यान तिरंगा खाली पडल्याने भारतीय अधिका-यांची अडचण झाली होती.

 

वाघा बॉर्डरवर ध्वज उभारण्याच्या निर्णयामागे मानसिकतेशिवाय दुसरं कारण असू शकत नाही. भारताने अटारी सीमेवर उभा केलेला ध्वज लाहोरमधूनही दिसत असल्याने पाकिस्तानी अधिका-यांना जनतेमधील आपली प्रतिष्ठा कमी झाल्याचं वाटत असावं. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं बीएसएफचे माजी अधिकारी डी एश सारन बोलले आहेत. यामागे कोणतंही दुसरं कारण असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.

 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

मार्च महिन्यात भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली. हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले होते.