शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 14:26 IST

भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता अटारी सीमेवरील तिरंग्यापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

अमृतसर, दि. 7 - भारताशी नेहमी स्पर्धा करु पाहणा-या पाकिस्तानने आता भारतापेक्षा उंज ध्वज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाघा बॉर्डरवर 400 फूट उंच ध्वजस्तंभावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. मार्च महिन्यात भारताकडून भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. भारताने ध्वज उभारल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली होती. इतकंच नाही तर भारत हेरगिरी करत असल्याचा आरोप करत कांगावा करण्यासही सुरुवात केली होती.

आणखी वाचा - 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

राज्यातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने ध्वजस्तंभ उभा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा करण्यात येणार आहे तेथील झाडे कापली जात आहेत. जर का सर्व काही नियोजनप्रमाणे पार पडलं तर हा जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल. 

 

याचवर्षी 5 मे रोजी भारताने 360 फूटावर तिरंगा उभारतला, मात्र जोरात वाहणा-या वा-यामुळे काही दिवसातच तो फाटला होता, ज्यामुळे तो बदलावा लागला होता. तिरंग्याची काळजी घेताना अधिका-यांना अनेक समस्या जाणवत आहेत. आतापर्यंत पाचवेळा तिरंगा बदलावा लागला आहे. ध्वजस्तंभालाही अद्याप तिरंग्याचा रंग देण्यात आलेला नाही. भारत - पाकिस्तान सीमारेषेवर बीटिंग रीट्रीट कार्यक्रमादरम्यान तिरंगा खाली पडल्याने भारतीय अधिका-यांची अडचण झाली होती.

 

वाघा बॉर्डरवर ध्वज उभारण्याच्या निर्णयामागे मानसिकतेशिवाय दुसरं कारण असू शकत नाही. भारताने अटारी सीमेवर उभा केलेला ध्वज लाहोरमधूनही दिसत असल्याने पाकिस्तानी अधिका-यांना जनतेमधील आपली प्रतिष्ठा कमी झाल्याचं वाटत असावं. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं बीएसएफचे माजी अधिकारी डी एश सारन बोलले आहेत. यामागे कोणतंही दुसरं कारण असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.

 

अटारी सीमेवर सर्वांत मोठा तिरंगा

मार्च महिन्यात भारत-पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर येथे एक मोठा तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. हा देशातील सर्वांत मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली. हा भारतीय ध्वज इतका उंच आहे की तो पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही सहजपणे दिसू शकेल, असे सांगण्यात आले होते.