शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

अखेर ब्रिटन स्वतंत्र

By admin | Updated: June 25, 2016 04:16 IST

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे.

मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे. मात्र जनमताचा कौल कळताच जगभरात अर्थकंप झाला. भारतीय शेअर बाजार दणक्यात आपटले, रुपया घसरला आणि सोन्याच्या किमतीत २,000 रुपयांनी वाढ झाली. शेअर बाजार आणि रुपयाच्या पडझडीतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही काही झटके बसले असले, तरी या घटनेचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम तत्कालिक असून, भविष्याचा विचार करता ही घटना भारतीय अर्थकारणाच्या पथ्यावर पडणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. शुक्रवारी सकाळी शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक हजार अंशांचा गडगडाट झाला आणि गुंतवणूकदारांचे १.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ३० सर्वोत्तम (पान १० वर)मान्सूनवर भिस्तब्रेक्झिटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नसल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यंदा मान्सून चांगला झाल्यास विकासाच्या प्रक्रियेला आणखी वेग मिळेल, जागतिक अर्थकारणाच्या अस्थिरतेच्या सावटातून भारत बाहेर पडले, असे मत आर्थिक वर्तुळात आहे. शेअर खरेदीस उत्तम काळशेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये एक हजार अंशांची घसरण झाली. दुपारी सेन्सेक्स सावरला असला तरी दिवसभर पडझडीचा ट्रेन्ड कायम होता. अनेक उत्तम कंपन्यांच्या समभागांमध्ये लक्षणीय घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक उत्तम समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध झाले आहेत.रुपया घसरला; डॉलर महागलाब्रेक्झिटचे वृत्त आल्यानंतर जगभरातील चलनांच्या किमतीत मोठी घसरण दिसली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात एक टक्क्याची घसरण झाली आणि रुपयाने ६८ रुपये १५ पैशाच्या पातळीला स्पर्श केला. देशात इंधनापासून विविध प्रकारच्या सुमारे ६७ जीवनावश्यक गोष्टी आयात केल्या जातात. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले तर आयातीचा खर्च वाढतो. परिणामी त्या वस्तूंचे भाव वाढताना दिसतात. ब्रिटनचे आता पुढे काय ?ब्रिटिश जनतेने सार्वमतातून युरोपियन संघाशी काडीमोड घेण्याचा कौल दिला आहे. आता ही प्रक्रिया २००९ च्या लिस्बन करारातील कलम ५० नुसार होईल. १९८२ नंतर पहिल्यांदाच या कलमाचा वापर केला जाईल.लिस्बन करारातील कलम ५० मधील तरतुदीतहत युरोपीय संघातील सर्व सदस्य देशांना वाटाघाटीसाठी दोन वर्षांचा कालावधी असतो. वाटाघाटीचा कालावधी वाढविताही येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया २०२० पर्यंत पूर्ण होईल. युरोपियन संघाचे विद्यमान आयुक्त आणि शक्यतो ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात वाटाघाटी होतील.