शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फिलीपाइन्सने मिळवला मारावीवर ताबा

By admin | Updated: June 16, 2017 16:52 IST

तीन आठवडे इसिसच्या ताब्यात गेलेल्या मारावी शहराच्या 90 टक्के भागावर फिलीपाइन्सच्या सैन्याने ताबा मिळवल्याचा दावा फिलीपाइन्सने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
 
मनिला, दि.16- तीन आठवडे इसिसच्या ताब्यात गेलेल्या मारावी शहराच्या 90 टक्के भागावर फिलीपाइन्सच्या सैन्याने ताबा मिळवल्याचा दावा फिलीपाइन्सने केला आहे. गेले काही दिवस मारावी इसिसच्या ताब्यातून हे शहर परत मिळवण्यासाठी फिलीपाइन्सची सुरक्षा दले प्रयत्न करत होते.
 
सुरक्षा दले आणि इसिसचे दहशतवादी यांच्यामध्ये होत असलेल्या चकमकीमुळे या शहरातील हजारो लोकांनी पलायन केले असून अजूनही काही नागरिक चकमकीच्या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चकमकींमध्ये आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये इसिसचे 206 लोक, 58 सैनिक आणि 26 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
 
आम्ही आता मारावीच्या आर्थिक केंद्रावर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून लवकरच ही लढाई थांबेवल अशी माहिती फिलिपिनो सैन्याचे प्रवक्ते ले. कर्नल. जो. एर. हेरेरा यांनी दिली आहे. काही धार्मिक नेत्यानी हवाई हल्ले थांबवून इसिसशी बोलणी करावी अशी विनंती फिलिपाइन्सचे राष्ट्ध्यक्ष  रॉड्रिगो ड्युटर्टे यांना केली होती. मात्र सैन्याने हवाई हल्ले चालूच ठेवले असून तीव्र हल्ले सुरुच ठेवले आहेत.  फिलिपाइन्समध्ये इसिसचे दहशतवादी घुसल्यानंतर संपुर्ण जगाने आश्चर्य व्यक्त केले होते. इतकी वर्षे फक्त मध्यपुर्वेत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने पश्चिमेस अस्तित्व असलेल्या दहशतवादी संघटना इसिसने फिलीपाइन्समध्ये पाय पसरल्याने फिलीपाइन्सच्या शेजारी देशांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. इंडोनेशियाचे लष्कर प्रमुख जनरल गॅटट नुर्म्यांतो यांनी इंडोनेशियाच्या प्रत्येक प्रांतामध्ये इसिसने पाय पसरले असण्याची शंका दोनच दिवसांपुर्वी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मारावी शहर असलेले बेट इंडोनेशियाच्या जवळ असल्यामुळे इसिसचे इंडोनेशियात येणे अत्यंत सोपे असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.