शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पाकिस्तानातून भारतात दरवर्षी येतात 5 अब्ज डॉलर्स

By admin | Updated: February 27, 2016 14:47 IST

भारतात सर्वाधिक विदेशी चलन ज्या देशांमधून येते त्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारतात सर्वाधिक विदेशी चलन ज्या देशांमधून येते त्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाकिस्तानमधून भारतात पाच अब्ज डॉलर्स पाठवले गेले आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने जागतिक बँकेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही देशांमध्ये वित्त व्यवहार जवळपास बंद असताना ही आकडेवारी आश्चर्यजनक आहे. विशेष म्हणजे जागतिक बँकेच्या अहवालानुसार हा प्रकार नवीन नसून ही नित्य चालणारी प्रक्रिया आहे आणि दरवर्षी पाकिस्तानातून भारतात येणारे परकीय चलन वाढतच आहे.
गेल्या वर्षी पाकिस्तानमधून भारतात 4.90 अब्ज डॉलर्स आले, त्याच्या आदल्या वर्षी 4.79 अब्ज तर त्याच्या आधीच्या वर्षी 4.67 अब्ज डॉलर्स भारतात आल्याचे वॉल स्ट्रीटने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जाहीर आकडेवारीनुसार मार्च 2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात अवघे 10 लाख डॉलर्स अधिकृतपणे आले आहेत. 
 
हे असं का होतं?
 
वर्ल्ड बँकेने एक मॉडेल तयार केलं आहे, ज्यामध्ये लोकसंख्या, स्थलांतरीत, सरासरी उत्पन्न आणि त्या त्या देशातलं राहणीमान या सगळ्याचा अभ्यास करून कुठल्या देशात कुठून किती पैसा आला गेला याचे आडाखे बांधण्यात येतात.
पाकिस्तानमध्ये भारतात जन्म झालेले व आता पाकिस्तानात असलेले 14 लाख लोकं आहेत. परंतु ते अनिवासी भारतीय नाहीत. अशा या भारतीय जन्माच्या पाकिस्तानींकडून हा पैसा भारतात येतो असा दावा जागतिक बँकेचा आहे. 
पाकिस्तानात जन्मलेले व आता भारतात असलेले 11 लाख लोक असून त्यांनी पाकिस्तानात 2 अब्ज डॉलर्स पाठवल्याचंही जागतिक बँकेच्या अहवालात असल्याचं वॉल स्ट्रीटने म्हटलं आहे. 
हा सगळा पैसा दोन्ही देशांमधल्या कुटुंबांकडे व नातेवाईंकांकडे पाठवला जातो असं जागतिक बँकेचं ठाम मत आहे. तर काही वाचकांनी भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी हा पैसा पाठवण्यात येतो की काय अशी भीतीही व्यक्त केली आहे. 
दोन्ही देशांतील लाखो लोकांचे नातेवाईक दुस-या देशात आहेत आणि विविध कारणांसाठी हवालामार्गे, मित्रांसोबत पाकिस्तानमधून किंवा मिळेल त्या अन्य मार्गाने पैसे पाठवण्यात येतात हे निश्चित आहे असं वर्ल्ड बँक म्हणते.