शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

चीनसोबत संबंध बिघडले, तरीही आम्ही मार्ग काढू; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:30 IST

क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले.

टोकियो: भारत - चीन सीमा विवादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरज नसून, दोन शेजारी देशांमधील समस्येवर तोडगा दोघांनीच शोधला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमा वादावर घेतली.

क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आलेल्या जयशंकर यांनी भारताचे चीनसोबतचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, चीन आणि भारतातील वादावर साहजिकच, जगातील इतर देशांनाही या विषयात रस असेल. कारण, आम्ही दोन मोठे देश आहोत आणि आमच्या संबंधांचा जगावर परिणाम होतो. मात्र, आमच्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इतर देशांकडे मदत मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

क्वाडमध्ये कोण?

परराष्ट्र मंत्री जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन, जपानच्या परराष्ट्र मंत्री योको कामिकावा आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

चीनला दिला थेट इशारा

येथे कोणताही देश दुसऱ्यावर वर्चस्व ठेवत नाही आणि प्रत्येक राष्ट्र सर्व प्रकारच्या दबावांपासून मुक्त असेल, असे थेट मत क्वाड गटाच्या सदस्य देशांनी केले. चीनचे थेट नाव न घेता, चार परराष्ट्र मंत्र्यांनी समुद्रातील परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

चीन म्हणतो...

क्वाडने विकास थांबविण्यासाठी कृत्रिमपणे तणाव निर्माण केल्याचा आरोप चीनने केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, हे देश मतभेद पेरण्यासाठी, संघर्ष निर्माण करण्यासाठी वाद निर्माण करत आहेत. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी हा मोठा धोका आहे, 

 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर