शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

ईद नमाजींवर हल्ला !

By admin | Updated: July 8, 2016 05:02 IST

१ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया

ढाका : १ जुलैच्या भीषण दहशतवादी हल्ल्यातून पुरते सावरत नाही तोच गुरुवारी पुन्हा बांगलादेश कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्याने हादरला. ईदनिमित्त किशोरगंज जिल्ह्यातील शोलकिया येथे दोन लाखांहून अधिक लोक नमाज पढत असताना दहशतवाद्यांनी तिथे बॉम्ब फेकून बेछूट गोळीबारही केला. बॉम्बस्फोटानंतर पोलीस आणि दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीने हा परिसर थरारला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह चार जण ठार झाले, तर पोलिसांनी एका दहतवाद्याचा खात्मा केला.बांगलादेशातील शोलकिया येथे ईदच्या प्रार्थनेसाठी जवळपास २० हजार लोक जमले होते. या प्रार्थनास्थळानजीकच हा हल्ला करण्यात आला. दोन पोलीस ठार, तर अन्य १३ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना एक गोळी झरनाराणी भौमिक या हिंदू महिलेला लागली आणि तीही मरण पावली. बॉम्बहल्ला झाल्याचे कळताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शिताफीने या परिसराची नाकेबंदी करून मोर्चा सांभाळत हल्लेखोरांशी मुकाबला केला.दोन संशयित हल्लेखोर जेरबंददोन संशयित हल्लेखोरांना जेरबंद करण्यात आले असून, १३ जण जखमी झाले आहेत. अतिरेक्यांना पकडण्यासाठी आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे किशोरगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबू सायेम यांनी सांगितले. सहा ते सात सशस्त्र हल्लेखोरांनी पोलिसांवर एकदम हल्ला केला. हे पोलीस प्रार्थनास्थळी जाणाऱ्या लोकांची तपासणी करीत होते. नमाजाच्या ठिकाणाच्या जवळच फेकण्यात आलेला बॉम्ब गावठी होता, असा प्राथमिक अंदाज आहे. एनएसजी पथक बांगलादेशला जाणार नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) एक पथक शुक्रवारी बांगलादेशला रवाना होणार आहे. ढाक्यात एका रेस्टॉरंटमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अभ्यास आणि विश्लेषण करण्यास हे पथक जाणार आहे. या पथकात अतिरेकी विरोधी अभियानातील एनएसजीच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. ‘ते’ मानवतेचे दुश्मन - शेख हसीनाईदच्या प्रार्थनेच्या वेळी हल्ला करणारे मानवतेचे दुश्मन आहेत, असे पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटवर हल्ला करणारे युवक काही महिन्यांपासून बेपत्ता होते. तेव्हा पालक आणि शाळांनी बेपत्ता मुलांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा शोध घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचारही केले जातील.