शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

कारगिल घुसखोरीमुळे वाजपेयींच्या पाठीत खंजीर

By admin | Updated: February 19, 2016 03:33 IST

पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते, अशी कबुली पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भारत आणि पाकमध्ये अभेद्य ऐक्य असण्यावर भर देताना त्यांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. मुशर्रफांच्या कारगिल दु:साहसामुळेच वाजपेयींनी सुरू केलेली भारत-पाक ऐतिहासिक शांतता प्रक्रिया उधळली गेली होती.मुशर्रफ यांनी हिंसक मार्गाने काश्मीर स्वतंत्र करू पाहणाऱ्या बिगर सरकारी घटकांना सोबत घेऊन कारगिल दु:साहस केले होते, असेही शरीफ म्हणाले. भारताच्या लडाख जिल्ह्यातील कारगिल भाग मे १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने बळकावला होता. तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यानंतर काही दिवसांनीच पाक लष्कराने हे दु:साहस केले होते. ‘माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे, असे वाजपेयी तेव्हा म्हणाले होते आणि ते खरेच होते. मी सुद्धा तेच बोललो होतो. कारगिल दु:साहसाने लाहोर शांतता कराराचा बळी घेतला.