शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

दुबईच्या हॉटेल व्यावसायिकाने टाळली १५ भारतीयांची फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:00 IST

संयुक्त अरब अमिरातींमध्ये खुनाच्या दोन खटल्यांमध्ये देहदंडाची शिक्षा झालेल्या १५ भारतीयांच्या गळयाभोवतीचा फास दुबईमधील एका दानशूर भारतीय हॉटेल व्यावसायिकाने सोडविला आहे.

जालंधर : संयुक्त अरब अमिरातींमध्ये खुनाच्या दोन खटल्यांमध्ये देहदंडाची शिक्षा झालेल्या १५ भारतीयांच्या गळयाभोवतीचा फास दुबईमधील एका दानशूर भारतीय हॉटेल व्यावसायिकाने सोडविला आहे. एस. पी. सिंग ओबेरॉय असे या दानशूराचे नाव असून त्यांच्या दातृत्वामुळे ज्यांना जिवदान मिळाले त्यांत पंजाबमधील १४ व बिहारमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. फाशी टळल्याने पंजाबमधील हे सर्व १४ जण आपापल्या घरी पोहोचले आहेत तर कागदपत्रांची पूर्तता व्हायची असल्याने बिहारमधील व्यक्ती अद्याप घरी पोहोचलेली नाही.

पंजाब प्रेस क्लबने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मृत्युदंड होऊनही संयुक्त अरब अमिरातींमधून सुखरूप परत आलेले पंजाबमधील सर्व १४ आरोपी त्यांचे उपकारकर्ते ओबेरॉय यांच्यासेबत उपस्थित होते. या सर्वांनी ओबेरॉय यांचे मनापासून आभार मानले.संयुक्त अरब अमिरातींमधील इस्लामी कायद्यानुसार खून झालेल्या व्यक्तीचे कुटुंब व खुनी यांच्यात समझोता होऊन कुटुंबियांनी माफ केले तर खुन्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्द होऊ शकते. खुन्याने हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला झालेल्या नुकसानीबद्दल ‘ब्लड मनी’ म्हणून काही रक्कम द्यायची व ती स्वीकारून कुटुंबाने खुन्याला माफ करायचे, असा सर्वसाधारणपणे हा समझोता असतो.

ओबेरॉय यांनी सांगितले की, या १५ खुन्यांना जीवदान मिळावे, यासाठी आपण आपल्या ‘सरबत दा खालसा ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांशी वाटाघाटी करून माफीसाठी त्यांचे मन वळविले. या लोकांच्या सुटकेसाठी आपण दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम ‘ब्लड मनी’ म्हणून चुकती केली, असे ते म्हणले. मात्र, नेमकी रक्कम सांगण्यास त्यांनी नकार दिला. उभय पक्षांमधील हा समझोता संबंधित न्यायालयात सादर करण्यात आला व न्यायालयांनी त्यास संमती दिल्यानंतर या आरोपींची सुटका झाली, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातील विरेंद्र चौहान यांच्या सन २०११ मध्ये शारजामध्ये झालेल्या खुनाबद्दल पंजाबमधील चार व बिहारमधील एका आरोपीस तेथील न्यायालयाने फाशी ठोठावली होती. दुसरे प्रकरण मोहम्मद फरहान या पाकिस्तानी नागरिकाच्या आॅक्टोबर २०१६ मध्ये अल ऐन, दुबई येथे झालेल्या खुनाचे होते. त्यात पंजाबमधील १० आरोपींना फाशी झाली होती. या दोन्ही प्रकरणांमधील मृत व खुनी हे नोकरीनिमित्त संयुक्त अरब अमिरातींत गेलेले होते व आपसातील भांडणांतून हे खून झाले होते.

आखाती देशांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांनी जो नाकरी देणार आहे, त्याची पार्श्वभूमी कसून तपासावी, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तेथे जाण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करावी आणि तेथे गेल्यावर कितीही आर्थिक अडचणी आल्या तरी बेकायदा धंद्यांमध्ये सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळावे, असा सल्ला ओबरॉय यांनी दिला. आता त्यांनी जी दोन ताजी प्रकरणे हाताळली त्यातील खून बेकायदा दारू विक्रीच्या वादातून झाले होते. अरब देशांमध्ये अशा बेकायदा धंद्यांना अजिबात दयामाया दाखविली जात नाही.ओबेरॉय यांच्या ‘सरबत दा खालसा ट्रस्ट’ने आत्तापर्यंत संयुक्त अरब अमिरातींमध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेल्या ९० जणांना अशा प्रकारे जीवदान दिले आहे. त्यासाठी ट्रस्टने संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना ‘ब्लड मनी’ म्हणून २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे.मदत करण्यात आलेले बहुतांश पंजाबमधील आहेत. पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्टने कार्यालय सुरू केले आहे. आखातात नोकरीला जाण्यापूर्वी या कार्यालयांकडून सर्व माहिती घ्यावी, असे आवाहनही ओबेरॉय यांनी केले.