शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

काश्मीर मुद्याशिवाय भारताशी चर्चा अशक्य

By admin | Updated: September 9, 2015 02:53 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत

इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानशी चर्चेसाठी अटी लादत आहेत. तथापि, आम्हीही काश्मीरच्या मुद्याशिवाय कुठलीही चर्चा स्वीकारूच शकत नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी आज दोन्ही देशांतील चर्चेच्या पूर्वसंध्येला आपली आडमुठी भूमिका जाहीर केली. पाकिस्तान रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांची बुधवारी नवी दिल्लीत बैठक होत आहे. अजीज म्हणाले की, मोदी यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेऊनच निवडणुका लढविल्या आणि आज ते चर्चेसाठी आमच्यावर अटी लादत आहेत; मात्र आम्ही या अटी मान्य करणार नाही, असा संदेश आम्ही नवी दिल्लीतही दिला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून होत असलेल्या गोळीबाराचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला जाईल. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे हा या बैठकीचा मूळ उद्देश आहे. २००३ मध्ये झालेल्या संघर्ष विराम कराराचा विषयही चर्चिला जाईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयांचे विशेष सहायक तारिक फातमी यांनी चीनच्या सरकारी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, भारत जर त्यांच्या पूर्वअटींवर कायम राहिला तर भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा होऊ शकत नाही. भारत व पाकिस्तानात यापूर्वी अशा अटींवर आधारित चर्चा कधी झाली नाही, असेही फातमी म्हणाले.