शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

सीमावाद लवकर सोडविण्याचा निर्धार

By admin | Updated: May 16, 2015 02:19 IST

: भारत व चीन यांच्यातील सीमावादावर राजकीय तोडगा काढून हा वाद लवकरात लवकर मिटवावा असा निर्धार भारत व चीन यांनी आज केला.

बीजिंग : भारत व चीन यांच्यातील सीमावादावर राजकीय तोडगा काढून हा वाद लवकरात लवकर मिटवावा असा निर्धार भारत व चीन यांनी आज केला. सीमावाद संपल्यास भारत व चीन यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळेल व इतर कोणतेही नवे अडसर निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. मोदी व चीनचे पंतप्रधान ली यांच्यात आज चर्चा झाली. चीनने भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबारेषेची (एलएसी- लाईन आॅफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल) कल्पना स्पष्ट करावी, सीमावादावर कोणताही पूर्वग्रह वा आपल्या पदाचा विचार न करता निर्णय घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. अनिश्चिततेमुळे सीमाभागात संवेदनशील तणाव निर्माण होत आहे. या भागातील गावात कोठे एलएसी आहे याची माहिती दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत नाही, असे मोदी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. सीमावाद, व्यापारी तूट, दहशतवाद, गुंतवणूक, हवामानातील बदल व संयुक्त राष्ट्रातील सुधारणा या मुद्यांचा समावेश त्यांच्या ९० मिनिटांतील चर्चेत होता. या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या काही दशकांपासून भारत व चीन यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. या संबंधांना चांगले वळण देणे ही दोन्ही देशांची ऐतिहासिक जबाबदारी आहे, असे मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. आपल्याला सहकार्यातील शक्तीची जाणीव व्हायची असेल, तर आपल्यातील गैरसमज, अविश्वास असणाऱ्या बाबींवरही चर्चा झाली पाहिजे, असे मोदी म्हणाले. भारत व चीन यांच्या संबंधात काही मतभेद आहेत हे आम्ही नाकारत नाही, पण यावर चर्चा करण्यासाठी यंत्रणा आहे. तोडगा काढण्यासाठी पुरेशी राजकीय परिपक्वता आहे. दोन्ही देशांनी शांतता व पारदर्शकता ठेवावी, असे यावेळी चीनचे पंतप्रधान ली यांनी सांगितले. नाते जुळले पाहिजे आपण आपल्यातील सीमावाद आधी सोडविला पाहिजे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे हे दोन्हीही देशांना माहीत आहे. आपली जबाबदारी ओळखून दोन्ही देशांनी ती पार पाडली पाहिजे व नव्या निर्धाराने पुढे गेले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी त्सिंगुआ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना म्हणाले. आपण सीमावादावर जो तोडगा काढू त्याने केवळ सीमेची समस्या सुटली असे होता कामा नये, त्या तोडग्याने आपले नाते बदलले पाहिजे, असे मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.