शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: कोरोनाला रोखून दाखवलं! 'या' देशात २०० दिवसांत एकाही रुग्णाची नोंद नाही

By कुणाल गवाणकर | Updated: October 30, 2020 12:13 IST

CoronaVirus News: देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळले; सात जणांचा मृत्यू

तैपेई: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. दिवसभरात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या तीन आठवड्यांपासून घसरत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांच्या खाली आली आहे. मात्र युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच फ्रान्स आणि जर्मनीमधील परिस्थिती बिघडली आहे. दोन्ही देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिकेतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

जगातील बडे देश कोरोना संकटामुळे हैराण झालेले असताना तैवाननं मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. तैवानमध्ये गेल्या २०० दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तैवानमध्ये १२ एप्रिलला कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडला. त्यानंतर देशात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेला नाही. त्यामुळे भल्याभल्या देशांना न जमलेली कामगिरी तैवाननं करून दाखवली आहे. 
तैवानची लोकसंख्या सव्वा दोन कोटी इतकी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण ५५३ रुग्ण आढळून आले. तर सात जणांचा मृत्यू झाला. आसपासच्या देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येताच तैवाननं तातडीनं प्रवासावर निर्बंध लादले. त्याचा परिणाम लगेचच दिसला. यासोबतच देशात मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आलं. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीनं उपचार सुरू झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.कोरोनाला रोखणाऱ्या तैवानची जगभरातून दखल घेतली गेली आहे. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी तैवानचं कौतुक केलं आहे. अमेरिकेतील खासदार बर्नी सँडर्स यांनी ट्विट करून तैवानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 'त्यांनी हे कसं काय केलं? त्यांनी विज्ञानावर विश्वास ठेवला,' असं सँडर्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या