शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

100 वर्षानंतर परग्रहावर वास्तव्य करावं लागेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ हॉकिंग यांचा दावा

By admin | Updated: May 4, 2017 13:43 IST

हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आणि वाढत्या लोकसंखेच्या संभाव्य धोक्यांमुळे पुढील 100 वर्षात एका नव्या ग्रहावर जाऊन वास्तव्य करण्याची गरज भासणार आहे

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 4 - पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे असा दावा ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केला आहे. बीबीसीवर सुरु होत असलेल्या एका नव्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आणि वाढत्या लोकसंखेच्या संभाव्य धोक्यांमुळे पुढील 100 वर्षात एका नव्या ग्रहावर जाऊन वास्तव्य करण्याची गरज भासणार आहे. 
 
‘बीबीसी टीव्ही’च्या ‘टुमारोज वर्ल्ड’ या मालिकेतल्या ‘एक्स्पिडिशन न्यू अर्थ’ या डॉक्युमेंटरीमध्ये शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांचा जुना विद्यार्थी क्रिस्टॉफे गैलफॉर्ड जगभ्रमंती करणार आहेत. यावेळी माणूस अंतराळात स्वत:ला कसा जिवंत ठेऊ शकतो याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच सीरिजमध्ये हॉकिंग यांनी दावा केला आहे की पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे. जिवंत राहण्यासाठी पृथ्वी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. येत्या काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य राहणार नसल्यानं माणसाला हे पाऊल उचलावंच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
 
गेल्याच महिन्यात हॉकिंग यांनी चेतावणी दिली होती की, तंत्रज्ञानासोबत जलगतीने वाढत चाललेली मानवाची आक्रमक वृत्ती आपल्याला न्यूक्लिअर किंवा जैविक युद्धाच्या माध्यमातून नष्ट करु शकते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होत चालला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन राहण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावल्याचा दावाही हॉकिंग्ज यांनी केला.
 
माणसानं केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरु शकते, असंही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल, असाही दावा त्यांनी केला.