शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सिल्क ट्रेनमुळे इराण-चीन संबंधांना नवी दिशा

By admin | Updated: February 19, 2016 17:33 IST

इराणवरील बंधने उठविल्यानंतर इराणच्या व्यापारधोरणात महत्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसत आहे.

ओंकार करंबेळकर
मुंबई, दि. 19 - इराणवरील बंधने उठविल्यानंतर इराणच्या व्यापारधोरणात महत्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसत आहे. चीनने थेट तेहरानपर्यंत चालविलेल्या नव्या रेल्वेमुळे इराण व चीन यांचेही संबंध अधिक दृढ होत आहेत. कोणे एकेकाळी मध्य आशिया, चीन थेट युरोपपर्यंत रेशीम मार्गाने जोडले गेले होते. अनेक जीवनावश्यक आणि मसाले, मौल्यवान वस्तूंचा व्यापार या मार्गाने होत असे. आता याच रेशीम मार्गावरील व्यापाराचे चीनने रेल्वे मार्गाने पुनरुज्जीवन केले आहे. 
चीनच्या झेजियांग प्रांतामधून तेहरानपर्यंत केवळ चौदा दिवसांमध्ये पोहोचलेल्या या मालगाडीला ३२ कार्गो डबे होते. चीनच्या या प्रयत्नाची दखल घेतली जात आहे कारण समुद्रमार्गापेक्षा निम्म्याहून कमी काळात माल पोहोचवण्यात ही रेल्वे यशस्वी झाली आहे. चीनच्या शांघाय बंदरापासून इराणच्या बंदर अब्बास या बंदरापर्यंत वाहतूक करण्यास साधारणत: एका महिन्याचा कालावधी जातो, त्या तुलनेमध्ये ही रेल्वे अधिक वेगवान असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या प्रवासात या रेल्वेने कझाखस्तान, किरगिझीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या सीमांमधूनही प्रवास केला. इतकेच नव्हे तर दोन देशांमध्ये स्टँडर्ड गेज नसल्यामुळे गेज बदलही करावा लागला.
भारताने इराणशी व्यापार संबंध वाढविण्यासाठी इराणच्या चाबहार बंदराचा विकास हाती घेतला असता चीनने केलेल्या या वेगवान प्रयत्नांकडे भारताला विशेष लक्ष दिले पाहिजे. रेशीम मार्गाचे रेल्वेमार्गाने पुनरुज्जीवन करण्यापुर्वी चीनने समुद्रमार्गानेही भारताच्या भोवतीच व्यापार मार्गाचे जाळे विणलेले आहे. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदिव, सोमालिया अशा देशांना आणि महत्वाच्या स्थानावर असणा-या बेटांना जोडून स्टींग ऑफ पर्ल्स हा सागरी व्यापार प्रकल्प चीनने आधीच तडीस नेला आहे. इराणच्याच बाबतीत बोलायचे झाले तर चीन आणि इराण यांनी तेलाच्या वापारावर स्थापन केलेले आपले संबंध इतर वस्तूंच्या बाबतीतही घट्ट केले आहेत. २०१४ साली तेलाचे दर उतरण्यापुर्वीच्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये ५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार होता. जानेवारी महिन्यात चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी तेहरानला भेट देऊन विविध विषयांवरील द्विपक्षीय चर्चेत सहभाग घेतला आणि हा व्यापार ६०० दशलक्ष डॉलर्सवर नेण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला.
चीन आणि इराणच्या या नव्या संबंधांवर भारताने भीतीयुक्त नजरेतून पाहण्यापेक्षा आपणही व्यापारवृद्धीसाठी कोणती पावले उचलू शकतो याचा विचार केला पाहिजे.