शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिल्क ट्रेनमुळे इराण-चीन संबंधांना नवी दिशा

By admin | Updated: February 19, 2016 17:33 IST

इराणवरील बंधने उठविल्यानंतर इराणच्या व्यापारधोरणात महत्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसत आहे.

ओंकार करंबेळकर
मुंबई, दि. 19 - इराणवरील बंधने उठविल्यानंतर इराणच्या व्यापारधोरणात महत्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसत आहे. चीनने थेट तेहरानपर्यंत चालविलेल्या नव्या रेल्वेमुळे इराण व चीन यांचेही संबंध अधिक दृढ होत आहेत. कोणे एकेकाळी मध्य आशिया, चीन थेट युरोपपर्यंत रेशीम मार्गाने जोडले गेले होते. अनेक जीवनावश्यक आणि मसाले, मौल्यवान वस्तूंचा व्यापार या मार्गाने होत असे. आता याच रेशीम मार्गावरील व्यापाराचे चीनने रेल्वे मार्गाने पुनरुज्जीवन केले आहे. 
चीनच्या झेजियांग प्रांतामधून तेहरानपर्यंत केवळ चौदा दिवसांमध्ये पोहोचलेल्या या मालगाडीला ३२ कार्गो डबे होते. चीनच्या या प्रयत्नाची दखल घेतली जात आहे कारण समुद्रमार्गापेक्षा निम्म्याहून कमी काळात माल पोहोचवण्यात ही रेल्वे यशस्वी झाली आहे. चीनच्या शांघाय बंदरापासून इराणच्या बंदर अब्बास या बंदरापर्यंत वाहतूक करण्यास साधारणत: एका महिन्याचा कालावधी जातो, त्या तुलनेमध्ये ही रेल्वे अधिक वेगवान असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या प्रवासात या रेल्वेने कझाखस्तान, किरगिझीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या सीमांमधूनही प्रवास केला. इतकेच नव्हे तर दोन देशांमध्ये स्टँडर्ड गेज नसल्यामुळे गेज बदलही करावा लागला.
भारताने इराणशी व्यापार संबंध वाढविण्यासाठी इराणच्या चाबहार बंदराचा विकास हाती घेतला असता चीनने केलेल्या या वेगवान प्रयत्नांकडे भारताला विशेष लक्ष दिले पाहिजे. रेशीम मार्गाचे रेल्वेमार्गाने पुनरुज्जीवन करण्यापुर्वी चीनने समुद्रमार्गानेही भारताच्या भोवतीच व्यापार मार्गाचे जाळे विणलेले आहे. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदिव, सोमालिया अशा देशांना आणि महत्वाच्या स्थानावर असणा-या बेटांना जोडून स्टींग ऑफ पर्ल्स हा सागरी व्यापार प्रकल्प चीनने आधीच तडीस नेला आहे. इराणच्याच बाबतीत बोलायचे झाले तर चीन आणि इराण यांनी तेलाच्या वापारावर स्थापन केलेले आपले संबंध इतर वस्तूंच्या बाबतीतही घट्ट केले आहेत. २०१४ साली तेलाचे दर उतरण्यापुर्वीच्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये ५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार होता. जानेवारी महिन्यात चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी तेहरानला भेट देऊन विविध विषयांवरील द्विपक्षीय चर्चेत सहभाग घेतला आणि हा व्यापार ६०० दशलक्ष डॉलर्सवर नेण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला.
चीन आणि इराणच्या या नव्या संबंधांवर भारताने भीतीयुक्त नजरेतून पाहण्यापेक्षा आपणही व्यापारवृद्धीसाठी कोणती पावले उचलू शकतो याचा विचार केला पाहिजे.