शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सुरक्षा परिषदेच्या कामकाज पद्धतीत बदल हवेत -भारत

By admin | Updated: February 17, 2016 02:58 IST

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली. १५ सदस्यांची ही सुरक्षा परिषद प्रभावशाली समजली जात असली तरी तिच्या कामकाजाच्या स्वरूपात बदल होण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले. ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या रूपात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा सन्मान व उद्देश’ विषयावरील खुल्या चर्चेत बोलत होते.अकबरुद्दीन म्हणाले की, ‘‘सुरक्षा परिषदेचे स्वत:चे घर व्यवस्थित नाही तरीही ती जगाच्या वेगवेगळ्या भागात लोकशाही आणि कायद्याच्या राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करीत आहे, ही मोठी विसंगती आहे.’’ सुरक्षा परिषदेचे सध्याचे स्वरूप आणि कामकाजाची पद्धत वास्तवापासून दूर असून ती निघून गेलेल्या काळाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ही परिषद कालसुसंगत असण्यासाठी तिच्यामध्ये सुधारणांशिवाय काही पर्याय नाही, असेही ते म्हणाले. परिषदेमध्ये सुधारणा घडविण्यासाठी तिला प्रलयकारी संकटाची वाट बघायची गरज नाही, असेही अकबरुद्दीन म्हणाले. (वृत्तसंस्था)