शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सुरक्षा परिषदेच्या कामकाज पद्धतीत बदल हवेत -भारत

By admin | Updated: February 17, 2016 02:58 IST

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तवापासून दूर गेली असून, ती भूतकाळाची प्रतिनिधित्व करीत आहे, अशी स्पष्ट टीका भारताने मंगळवारी केली. १५ सदस्यांची ही सुरक्षा परिषद प्रभावशाली समजली जात असली तरी तिच्या कामकाजाच्या स्वरूपात बदल होण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले. ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या रूपात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा सन्मान व उद्देश’ विषयावरील खुल्या चर्चेत बोलत होते.अकबरुद्दीन म्हणाले की, ‘‘सुरक्षा परिषदेचे स्वत:चे घर व्यवस्थित नाही तरीही ती जगाच्या वेगवेगळ्या भागात लोकशाही आणि कायद्याच्या राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करीत आहे, ही मोठी विसंगती आहे.’’ सुरक्षा परिषदेचे सध्याचे स्वरूप आणि कामकाजाची पद्धत वास्तवापासून दूर असून ती निघून गेलेल्या काळाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ही परिषद कालसुसंगत असण्यासाठी तिच्यामध्ये सुधारणांशिवाय काही पर्याय नाही, असेही ते म्हणाले. परिषदेमध्ये सुधारणा घडविण्यासाठी तिला प्रलयकारी संकटाची वाट बघायची गरज नाही, असेही अकबरुद्दीन म्हणाले. (वृत्तसंस्था)