शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
4
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
5
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
6
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
7
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
8
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
9
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
10
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
11
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
12
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
13
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
14
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
15
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
16
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
17
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
18
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   
19
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
20
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे

पठाणकोट हल्ल्यामुळे चर्चेला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 03:27 IST

पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे

इस्लामाबाद : पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराला आणि त्यातही लष्करप्रमुख राहील शरीफ यांना संदेश म्हणून मानले जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा व्हावी यासाठी नवाज शरीफ प्रयत्नशील होते; पण लष्कर अशा चर्चेला अनुकूल नव्हते. त्याचवेळी पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेचा इन्कारही केला जात नाही.पठाणकोट हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले की, भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी भारत करीत आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.पठाणकोट हल्ल्यामागे मसूदच्या असलेल्या भूमिकेचा पुरावा भारताने पाकिस्तानला दिला आहे; पण तीन आठवडे होऊनही पाकिस्तानने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील विदेश सचिवांची चर्चाही लटकली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई केल्यानंतरच चर्चा सुरू केल्याचे संकेत भारत सरकारने दिले आहेत. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ पुढे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्याची चौकशी लवकरच पूर्ण होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या पाकिस्तानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंध योग्य दिशेने जात होते; पण पठाणकोट हल्ल्याने ही प्रक्रिया थांबली. परंतु आता दहशतवादी पराभूत झाले असून, ते निराश झाले आहेत. आपली उपस्थिती दाखविण्यासाठीच ते अशा घटना घडवून आणत आहेत. भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. पठाणकोट हल्ल्यासाठी आमच्या जमिनीचा वापर करण्यात आला काय? हे शोधून काढण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते काम करू .- नवाज शरीफ