शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

By admin | Updated: July 6, 2017 16:13 IST

भूतान हा फार आनंदी देश नसल्याचा कांगावा चिनी मीडियानं सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 6 - भूतान हा फार आनंदी देश नसल्याचा कांगावा चिनी मीडियानं सुरू केला आहे. हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भूतान सर्वोच्च स्थानावर असला तरी त्या देशातील लोक आनंदी नाहीत, असं चिनी मीडियानं म्हटलं आहे. चिनी मीडियानं आता भारताला लक्ष्य करत भूतानवर निशाणा साधला आहे. भारत-चीनच्या वादात भूतानही सामील झाल्यामुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भूतान हा भारताच्या दबावाखाली आहे, त्यामुळे दिल्लीतल्या हुकूमशाहांचा आदेश मानण्याशिवाय भूतानकडे दुसरा पर्याय नाही. ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखातून भूतानवर टीका करण्यात आली आहे. भूतान हा आनंदी देश नाही. भारताच्या दबावामुळेच भूतानमधील लोक नाखूश आहेत. भूतानमधील जवळपास 1,00,000 लोकांना निर्वासित करण्यात आलं आहे. भारताच्या चुकीमुळेच भूतानला असं करावं लागलं आहे.भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ तैनात असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते.चीनच्या सैनिकांनी भूतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे तुमचे म्हणणे मला सुधारायचे आहे. चिनी सैनिक चीनच्याच भूभागात तैनात आहेत, असे हा प्रवक्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला होता. भारताच्या सैनिकांनी सिक्कीम सेक्टरमधील डोंगलोंग भागातील चीनच्या बाजूकडून प्रवेश केल्याचा आरोपही त्याने केला होता. भारतीय जवानांनी नित्याची कामे थांबवण्याचा प्रयत्न केला होता. चीनने स्वायत्तता सुरक्षित राखणे आणि भूभागाची एकात्मता जपण्यासाठी या कामांना योग्य तो प्रतिसाद दिला, असेही त्याने म्हटले होते. भारताने केलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्यात आणि चीनच्या भूभागातून सगळ्या सैनिकांना काढून घ्यावे, असे आम्ही स्पष्ट केले होते.
भूतानने त्याच्या डोंगलांगमधील झोंपलरी भागात असलेल्या लष्करी छावणीकडे चीन बांधत असलेल्या रस्त्याला बुधवारी आक्षेप घेतला होता. चीनचं रस्त्याचं बांधकाम थांबवून तत्काळ पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास सांगितले होते. भूतानने हा आक्षेप येथील दूतावासामार्फत घेतला होता. डोंगलांग भागातील झोंपलरी येथील भूतानच्या लष्करी छावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चीनच्या लष्कराने नुकतेच सुरू केले. त्यामुळे दोन देशांतील (चीन व भूतान) कराराचे उल्लंघन होते, असे भूतानचे भारतातील राजदूत वेटसोप नामग्याल यांनी नवी दिल्लीत म्हटले होते. डोंगलांग हा चुम्बी खोऱ्यानजीक तीन सीमा एकत्र येणारा भाग असून, तो चीनच्या नियंत्रणात आहे. भूतानने त्या भागावर हक्क सांगितलेला आहे.