शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारे निर्मनुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:13 IST

आजवर थायलंडनं इतक्या आपत्तींना तोंड दिलं, पण त्यांचा पर्यटनव्यवसाय कायमच अभेद्य राहिला आणि त्यांची अर्थव्यवस्थाही अगदी रसातळाला गेली नाही. यावेळी मात्र त्यांना फटका बसलाच.

ठळक मुद्देपर्यटकांअभावी लोकांवर भुके मरण्याची वेळ.

- लोकमत न्यूज नेटवर्कथायलंड हा असा देश आहे, ज्याची जवळपास संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. निसर्गसौंदर्यानं संपन्न असलेल्या या देशाला जगभरातले पर्यटकही पहिली पसंती देत असतात. कोरोनाच्या काळात तेथील  पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असला तरी थायलंडला याआधीही अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं आहे. गेल्या 25 वर्षांत अनेक मोठे आघात थायलंडनं पचवले आहेत. 1997ला अर्थव्यवस्थचं पार वाटोळं झालं होतं, 2004ला त्सुनामीचा तडाखा बसला होता, 2006 आणि 2014ला राजकीय अस्थिरतेचा फटका बसला होता, 2008ला एअरपोर्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला होता आणि 2010मध्ये राजकीय हिंसाचारामुळे थायलंडच्या प्रगतीला खीळ बसली होती. पण तरीही या प्रत्येक परिस्थितीत थायलंड तगून गेलं. त्यांचा पर्यटन व्यवसाय टिकून राहिला, नुकसान झालं, पण याही परिस्थितीत देशाला मोठा आधार दिला, तो पर्यटन क्षेत्रानंच. तिथल्या पर्यटनासंदर्भातली आकडेवारीही मोठी बोलकी आहे.  साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1960मध्येही थायलंडला तब्बल 80 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. गेल्या वर्षी, 2019मध्ये पर्यटकांचा हाच आकडा तब्बल चार कोटींपर्यंत गेला  आणि थायलंडच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्रानं आजपर्यंतचा सर्वाधिक वाटाही उचलला. गेल्या वर्षी थायलंडला पर्यटनातून तब्बल साठ अब्ज डॉलरची कमाई झाली.आजवर थायलंडनं इतक्या आपत्तींना तोंड दिलं, पण त्यांचा पर्यटनव्यवसाय कायमच अभेद्य राहिला आणि त्यांची अर्थव्यवस्थाही अगदी रसातळाला गेली नाही. आजही त्यांच्या अर्थव्यवस्थेतला जवळपास 25 टक्के वाटा पर्यटनातून येतो. त्यांची पर्यटनाची ही बाजू अतिशय तगडी असल्यामुळेच थायलंडला ‘टेफलॉन थायलंड’ असंही म्हटलं जातं. म्हणजेच ‘कधीही गंज न चढणारा देश’! अशी या देशाची ओळख आहे, पण कोरोनानं आज थायलंडच्या या बिरुदावलीलाच मोठा धक्का दिला आह. कारण तिथला पर्यटनव्यवसाय एकदम कोलमडून पडला आहे. जगभरातल्या  रसिक पर्यटकांनी कायम भरलेले तिथले समुद्रकिनारे अक्षरश: ओस पडले आहेत. कोणी चिटपाखरूही आज या समुद्रकिनार्‍यांवर दिसत नाही. देशातले बहुसंख्य लोक पर्यटनावर अवलंबून असल्यानं अचानक त्यांच्यावर भुके मरण्याची वेळ आली आहे. सरकार या परिस्थितीवर मात करण्याचा निकराचा प्रय} तर करतंय, पण त्यात लवकर यश येण्याची चिन्हे नाहीत. तात्पुरता उपाय म्हणून सरकारनं विविध कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. त्याचवेळी दूरसंचार कंपन्यांनाही आवाहन केलं आहे, की त्यांनी लोकांना दरमहा दहा जीबी डेटा फ्री द्यावा. त्यामुळे लोकांना किमान एकमेकांच्या संपर्कात राहता येईल! अर्थव्यवस्था सुधारल्यावर या कंपन्यांना त्यांचा परतावा दिला जाणार आहे, पण कधी, हे निदान आज तरी कोणीच सांगू शकत नाही!.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या