शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मानवी हक्कांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे

लंडन : नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे. मोदी सत्तेत आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्याचा दावा अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने केला आहे. जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, संघटनेने सरकारच्या विकासकामांबद्दल गौरवोद्गारही काढले आहेत.भूमी अधिग्रहणावरून संसदेत आणि बाहेर सरकारला विरोधाचा सामना करावा लागला असताना यावर अ‍ॅमनेस्टीनेही ताशेरे ओढले आहेत. या अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे, अशा परखड शब्दांत अ‍ॅमनेस्टीने आपले मत मांडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झटत असलेल्या अ‍ॅमनेस्टीच्या २०१५ च्या वार्षिक अहवालामुळे मोदी सरकारची जागतिक नाचक्की झाली आहे. अ‍ॅमनेस्टीच्या ताज्या अहवालात मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित हिंसाचार, जातीय दंगली आणि कॉर्पोरेटशी संबंधित योजनांबाबत सल्लामसलत करण्यात सरकारला अपयश आल्याचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. सरकारी अधिकारी नागरिकांचे खासगीपण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे सातत्याने उल्लंघन करत असल्याच्या मुद्याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. जातीय हिंसाचाराचा हवाला देत अहवालात म्हटले की, ‘निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भडकलेल्या जातीय हिंसाचाराने हिंदू व मुस्लिम समुदायात तणाव वाढला. यासाठी राजकीय नेते जबाबदार आहेत व काही प्रकरणात प्रक्षोभक भाषणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.’ अहवालात डिसेंबरमध्ये हिंदू संघटनांवर अनेक मुस्लिम व ख्रिश्चन यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा आरोप झाल्याचेही म्हटले आहे. (वृत्तसंस्था)