शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मानवी हक्कांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: February 26, 2015 00:11 IST

नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे

लंडन : नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारतातून होत असतानाच आता यात जागतिक संघटनांचीही भर पडली आहे. मोदी सत्तेत आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्याचा दावा अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने केला आहे. जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, संघटनेने सरकारच्या विकासकामांबद्दल गौरवोद्गारही काढले आहेत.भूमी अधिग्रहणावरून संसदेत आणि बाहेर सरकारला विरोधाचा सामना करावा लागला असताना यावर अ‍ॅमनेस्टीनेही ताशेरे ओढले आहेत. या अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे, अशा परखड शब्दांत अ‍ॅमनेस्टीने आपले मत मांडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झटत असलेल्या अ‍ॅमनेस्टीच्या २०१५ च्या वार्षिक अहवालामुळे मोदी सरकारची जागतिक नाचक्की झाली आहे. अ‍ॅमनेस्टीच्या ताज्या अहवालात मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित हिंसाचार, जातीय दंगली आणि कॉर्पोरेटशी संबंधित योजनांबाबत सल्लामसलत करण्यात सरकारला अपयश आल्याचा मुद्दाही अधोरेखित केला आहे. सरकारी अधिकारी नागरिकांचे खासगीपण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे सातत्याने उल्लंघन करत असल्याच्या मुद्याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. जातीय हिंसाचाराचा हवाला देत अहवालात म्हटले की, ‘निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भडकलेल्या जातीय हिंसाचाराने हिंदू व मुस्लिम समुदायात तणाव वाढला. यासाठी राजकीय नेते जबाबदार आहेत व काही प्रकरणात प्रक्षोभक भाषणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.’ अहवालात डिसेंबरमध्ये हिंदू संघटनांवर अनेक मुस्लिम व ख्रिश्चन यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा आरोप झाल्याचेही म्हटले आहे. (वृत्तसंस्था)