शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"बांगलादेशच्या हिंदूंवरील हल्ल्यांना खूप वाढवून सांगितलं जातंय, घडतंय ते चूक आहे, पण.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:15 IST

Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केला मोठा दावा

Attacks on Hindus, Bangladesh Violence: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातीलहिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना मोठा दावा केला. या गोष्टींना मुद्दामून वाढीव पद्धतीने दाखवले जात आहे असा दावा त्यांनी केला. यासोबतच भारतात या घटना कशाप्रकारे दाखवल्या जात आहेत, त्या माध्यमांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रश्न उपस्थित केले. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हा जातीय मुद्दा नाही, याला राजकीय वळण दिल जात आहे. मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले आहे की हा मुद्दा मूळ प्रमाणापेक्षा अतिशयोक्तीने वाढवला जात आहे. या घटनांना विविध मुद्द्यांच्या छटा आहेत.

"जेव्हा शेख हसीना आणि अवामी लीग यांच्या अत्याचारानंतर देश अशांत होता, तेव्हा जे लोक त्यांच्यासोबत होते त्यांनाही हल्ल्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर काहींनी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना हिंदूंना मारहाण केली, कारण बांगलादेशातील हिंदू म्हणजे अवामी लीग समर्थक असा समज आहे. जे घडले ते योग्य आहे असे मी अजिबात म्हणत नाही, पण काही लोक या गोष्टींचा गैरवापर करत आहेत."

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार झाल्यानंतर लगेच युनूस यांनी गेल्या महिन्यात नवी दिल्लीशी संपर्क साधला होता. त्यांच्या पहिल्या थेट संपर्कात युनूस यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले होते की ढाकामधील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक गटांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाची पुष्टी केली आणि हिंसाचारग्रस्त देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर दिला.

मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, बांगलादेश हा इतर देशांप्रमाणेच दुसरा शेजारी आहे. मी हिंदू समुदायाच्या सदस्यांना भेटलो तेव्हाही त्यांना हिंदू म्हणून ओळख देऊ नये अशी विनंती केली होती. त्यापेक्षा तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला समान अधिकार आहेत असे म्हणायला सांगितले होते. नागरिक म्हणून तुमचे कायदेशीर अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी