शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे. आमच्या हिमनद्या हळूहळू अस्तंगत होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते; मात्र आता कळले आहे की, हा वेग आपण समजत होतो त्याहून अधिक आहे. आकडेवारी भीतिदायक आहे. १९७५ ते २०१२ दरम्यान आर्टिक्ट बर्फाची जाडी ६५ टक्क्यांनी घटली आहे. दोन्ही धु्रव आणि उष्णकंटीबंधीय प्रदेशांमध्ये तापमानात असलेल्या फरकामुळे पृथ्वीच्या मोठ्या भूभागात वारे वाहतात. जर आर्टिक्टचे तापमान उष्णकटीबंधीय प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढले, तर पृथ्वीवर अनपेक्षित ठिकाणी अवकाळी उष्णतेची लाट येईल आणि हा मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय आहे. आर्टिक्टच्या पर्माफ्रॉस्टमध्ये (बर्फाने झाकलेला मातीचा थर) मोठ्या प्रमाणात जैवपदार्थ आहेत. बर्फ वितळल्यामुळे हे पदार्थ उष्णतेने जळून कॉर्बन डायक्साईड किंवा मिथेनच्या रूपात वातावरणात मिसळतील. त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होईल. आर्टिक्टच्या ग्रीनलॅण्ड पट्ट्यात पृथ्वीच्या दहा टक्के गोडे पाणी आहे. जर तेथील बर्फ वितळला तर समुद्राची पाणीपातळी या शतकाच्या अखेरीस ७४ से. मी. हूनही अधिक वाढेल. ही बाब समुद्रकिनारी वसलेल्या शहरांसाठी धोकादायक ठरू शकते. मानवाने गेल्या एका शतकात निसर्गात जेवढी ढवळाढवळ केली तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. याच एका शतकात जगाची लोकसंख्याही खूप वेगाने वाढली. मानवाने आपल्या गरजांसाठी अनेक शोध लावून निसर्गात एवढी ढवळाढवळ केली की, पर्यावरणाचे संतुलनच बिघडून गेले. जगभरातील हवामानात बदल घडतील-तापमानवाढीमुळे तीन दशकांत आर्टिक्टवरील बर्फाचे क्षेत्रफळ जवळपास निम्मे झाले आहे. आर्टिक्टकौन्सिलचा ताजा अहवाल स्नो, वॉटर, आइस, पर्माफ्रॉस्ट इन द आर्टिक्टनुसार, बर्फ वितळण्याचा वेग पाहता २०४० पर्यंत आर्टिक्टवरील बर्फ पूर्णपणे वितळून जाईल. आर्टिक्टवरील बर्फ २०७० पर्यंत वितळून जाईल, असा अंदाज पूर्वी व्यक्त करण्यात येत होता; मात्र हवामानातील असामान्य बदलामुळे ही दुर्दैवी वेळ लवकर येईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.गेल्या सात मार्च रोजी आर्टिक्टवरील बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी होते. तज्ज्ञांच्या मते, तापमानवाढीमुळे येत्या काही वर्षांत जगभरातील हवामानात भयंकर बदल दिसतील.आर्टिक्टवरील बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अनेक भयंकर बदल घडून येऊ शकतात. हा अहवाल आंतरराष्ट्रीय नियतकालिक द इकोनॉमिस्टमध्ये प्रकाशित झाला आहे.