शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

आर्टिक्टवरील बर्फ वितळणार

By admin | Updated: May 11, 2017 00:27 IST

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच त्यांच्या वितळण्याचा वेगही खूपच वाढला आहे. आमच्या हिमनद्या हळूहळू अस्तंगत होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे आतापर्यंत म्हटले जात होते; मात्र आता कळले आहे की, हा वेग आपण समजत होतो त्याहून अधिक आहे. आकडेवारी भीतिदायक आहे. १९७५ ते २०१२ दरम्यान आर्टिक्ट बर्फाची जाडी ६५ टक्क्यांनी घटली आहे. दोन्ही धु्रव आणि उष्णकंटीबंधीय प्रदेशांमध्ये तापमानात असलेल्या फरकामुळे पृथ्वीच्या मोठ्या भूभागात वारे वाहतात. जर आर्टिक्टचे तापमान उष्णकटीबंधीय प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढले, तर पृथ्वीवर अनपेक्षित ठिकाणी अवकाळी उष्णतेची लाट येईल आणि हा मानवी जीवनासाठी चिंतेचा विषय आहे. आर्टिक्टच्या पर्माफ्रॉस्टमध्ये (बर्फाने झाकलेला मातीचा थर) मोठ्या प्रमाणात जैवपदार्थ आहेत. बर्फ वितळल्यामुळे हे पदार्थ उष्णतेने जळून कॉर्बन डायक्साईड किंवा मिथेनच्या रूपात वातावरणात मिसळतील. त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणखी तीव्र होईल. आर्टिक्टच्या ग्रीनलॅण्ड पट्ट्यात पृथ्वीच्या दहा टक्के गोडे पाणी आहे. जर तेथील बर्फ वितळला तर समुद्राची पाणीपातळी या शतकाच्या अखेरीस ७४ से. मी. हूनही अधिक वाढेल. ही बाब समुद्रकिनारी वसलेल्या शहरांसाठी धोकादायक ठरू शकते. मानवाने गेल्या एका शतकात निसर्गात जेवढी ढवळाढवळ केली तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. याच एका शतकात जगाची लोकसंख्याही खूप वेगाने वाढली. मानवाने आपल्या गरजांसाठी अनेक शोध लावून निसर्गात एवढी ढवळाढवळ केली की, पर्यावरणाचे संतुलनच बिघडून गेले. जगभरातील हवामानात बदल घडतील-तापमानवाढीमुळे तीन दशकांत आर्टिक्टवरील बर्फाचे क्षेत्रफळ जवळपास निम्मे झाले आहे. आर्टिक्टकौन्सिलचा ताजा अहवाल स्नो, वॉटर, आइस, पर्माफ्रॉस्ट इन द आर्टिक्टनुसार, बर्फ वितळण्याचा वेग पाहता २०४० पर्यंत आर्टिक्टवरील बर्फ पूर्णपणे वितळून जाईल. आर्टिक्टवरील बर्फ २०७० पर्यंत वितळून जाईल, असा अंदाज पूर्वी व्यक्त करण्यात येत होता; मात्र हवामानातील असामान्य बदलामुळे ही दुर्दैवी वेळ लवकर येईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.गेल्या सात मार्च रोजी आर्टिक्टवरील बर्फाचे प्रमाण अत्यंत कमी होते. तज्ज्ञांच्या मते, तापमानवाढीमुळे येत्या काही वर्षांत जगभरातील हवामानात भयंकर बदल दिसतील.आर्टिक्टवरील बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अनेक भयंकर बदल घडून येऊ शकतात. हा अहवाल आंतरराष्ट्रीय नियतकालिक द इकोनॉमिस्टमध्ये प्रकाशित झाला आहे.