शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नवाज शरीफच बातम्या पसरवत असल्याचा लष्कराला संशय

By admin | Updated: October 15, 2016 13:31 IST

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख राहील शरीफ यांनी सरकार आणि लष्करात फूट पडल्याची बातमी बाहेर येण्याचे खापर नवाज शरीफ यांच्यावर फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 15 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि तेथील लष्करामध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती वारंवार समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सरकार आणि लष्करात सारे काही आलबेल असल्याचे कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यातील वाद लपू शकत नाही, हीच बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. 
 
पाकिस्तान लष्कराचे प्रमुख राहिल शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लष्करातील वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सरकार आणि लष्करात फूट पडल्याची बातमी बाहेर येण्याचे खापर नवाज शरीफ यांच्यावर फोडले आहे. शरीफ यांनी मतभेदाची बातमी फोडल्याचा संशय पाकिस्तान लष्कराने व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने सरकार आणि लष्करात मतभेद निर्माण झाल्याची माहिती फुटण्यावर या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या संदर्भातील बातमी छापणा-या डॉन वृत्तपत्राच्या पत्रकारवही देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 
आणखी बातम्या
 
भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करासोबत राष्ट्रीय सुरक्षेबाबत बैठक घेतली होती. मात्र, 
या बैठकीची बनावट तसेच कथित बातमी छापल्याची घटना राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन असल्याचे सांगत, राहिल शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी झालेल्या अधिका-यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच 'डॉन' वृत्तपत्राला बैठकीतील गुप्त माहिती कळण्याबाबत पाकिस्तानी लष्कराने थेट नवाज सरकारलाच जबाबदार धरल्याचे दिसत आहे. यावरुनच, पाकिस्तानचे सरकार आणि लष्करात मतभेद असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. 
 
दरम्यान, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून हक्कानी व लष्कर-ए-तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांना संरक्षण मिळत असून त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा पडत चालला आहे. आयएसआयच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त ‘डॉन’ दैनिकात 6 ऑक्टोबर रोजी सायरिल अलमिडा यांनी बातमी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर देशातून बाहेर जाण्यास सरकारने मनाई केली आहे.