शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अदनान सामीला VIP वागणूक, आमचं काय? पाकमधून २० वर्षांपूर्वी आलेल्या स्थलांतरीतांची व्यथा

By admin | Updated: January 2, 2016 13:17 IST

शेकडो हिंदूंसह अहमदी पंथाच्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही

ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. २ - अदनान सामीला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं, परंतु पाकिस्तानातून आलेल्या शेकडो हिंदूंसह अहमदी पंथाच्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही. यामुळे अदनान सामीला VIP वागणूक मिळाल्याची व गरीबांना कुणी वाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जालंधर व पठाणकोटमध्ये पाकिस्तानातून अनेक वर्षांपूर्वी आलेले सुमारे ३०० हिंदू राहतात. त्यांचे नागरिकत्वाचे अर्ज सरकार दरबारी नुसतेच पडून आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे खास सरकारी ठेवणीचे उत्तर त्यांना ऐकवले जाते. तर कादियान समजाच्या पाकिस्तानातल्या मुलींनी भारतात लग्न केली आहेत, त्यांना मुलंही आहेत, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही. 
माझं २००३ मध्ये भारतातल्या नागरिकाशी लग्न झालं, परंतु अदनानवर प्रेमाचा वर्षाव करणा-या भारत सरकारनं दशकभरात मला मात्र नागरिकत्व का दिलं नाही असा प्रश्न ताहिरा झहूर या महिलेनं विचारला आहे. अहमदिया पंथीयांचं कादियान या भारतातलं मुख्यालय आहे. दोन्ही देशात या पंथाचे लोक असून लग्नामुळे त्यांच्यात देशांतर घडतं. 
माझ्या अर्जाचं नक्की काय झालंय हेच कळायला मार्ग नसल्याची व्यथा ताहिरानं मांडली आहे. कदाचित मी बॉलीवूडमधली सेलिब्रिटी नसल्यामुळं माझ्या अर्जाला किंमत नसावी असंही तिनं म्हटलं आहे. 
पंजाबमध्ये पाकिस्तानातून आलेल्या ३००च्या वर हिंदूंची गतही वेगळी नाही. अनेकांचे पाकिस्तानी पासपोर्ट संपलेले आहेत, आणि व्हिसाची मुदत केवळ वाढवली जाते. अदनान सामीवर कृपादृष्टी केलेले भारत सरकार आमच्यावर कधी मेहेरबान होणार असा प्रश्न हे स्थलांतरीत विचारत आहेत.