शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

उष्णतेच्या लाटेने कराचीत ७०० ठार

By admin | Updated: June 24, 2015 00:18 IST

पाकिस्तानला दशकातील तीव्र उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला असून, सिंध प्रांताची राजधानी असणाऱ्या कराची शहरात या लाटेने सुमारे ७०० बळी घेतले आहेत.

कराची : पाकिस्तानला दशकातील तीव्र उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला असून, सिंध प्रांताची राजधानी असणाऱ्या कराची शहरात या लाटेने सुमारे ७०० बळी घेतले आहेत. उष्णतेच्या कहरामुळे शहरातील सर्व शाळा व सरकारी कार्यालये बंद करण्यात आली असून या नैसर्गिक संकटाशी लढण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. ही उष्णतेची लाट सिंध प्रांतात आहे. रमजान सुरू झाला तेव्हापासून म्हणजेच शुक्रवारपासून उष्णतेचा पारा वाढताना दिसत आहे. उष्णतेमुळे शहरातील सर्व रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कराची शहरात सर्वाधिक बळी गेले असून मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे. सिंध प्रांतातील इतर गावेही या लाटेत होरपळली आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत शहरातील तीन रुग्णालयातील मृतांचा आकडा ३४१ होता, पण नंतर मृतांची रांगच लागली असून, मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे. कराचीत शुक्रवारपासून तापमान ४४ ते ४५ अंश सें.ग्रे. पर्यंत जात आहे. मंगळवारी संध्याकाळी उष्ण हवेला उतार पडेल असे हवामान कार्यालयातर्फे सांगितले जात आहे. सोमवार संध्याकाळपासून उष्णतेमुळे २०० जण मरण पावले आहेत, असे जिना रुग्णालयाच्या अधीक्षिका सीमी जमाली यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांत उष्णतेचे विकार झालेले ३ हजार रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार होत आहेत, असे जमाली म्हणाल्या. अब्बासी शहीद रुग्णालयात ७१ लोक उष्णतेमुळे मरण पावले असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मरणारांची संख्या ७० आहे. पाकिस्तान लष्कर व निमलष्करानेही उष्णतेमुळे आजारी असलेल्या लोकांवर उपचारासाठी विशेष केंद्रे सुरू केली आहेत. तसेच सरकारी रुग्णालयांना औषधाचा पुरवठा केला आहे. दरम्यान, भारतामध्येही यंदाच्या उन्हाळ्यात उष्णता लाटेने सुमारे २ हजार बळी गेले. (वृत्तसंस्था)