शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

68 टक्के पाकिस्तानी नागरिक भारताशी चर्चा करण्याच्या बाजूने

By admin | Updated: January 7, 2017 08:02 IST

एका सर्व्हेनुसार 68 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - उरी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिंकल स्ट्राईक यामुळे भारत - पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे पाकिस्तान सरकार चर्चा करण्याऐवजी रोज शस्त्रसंधी उल्लंघन करुन चर्चेमध्ये अडथळे आणत असताना पाकिस्तानी नागरिकांना मात्र भारतासोबत चर्चा व्हावी असं वाटत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार 68 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 
 
68 टक्के पाकिस्तानी नागरिक भारताशी चर्चा व्हावी या मताचे असून यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे.  गिलानी रिसर्च फाऊंडेशनने हा सर्व्हे केला आहे. 
 
या सर्व्हेमध्ये 1835 लोक सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता. देशातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. पंजाब, सिंध, बलुचिस्तान प्रांतामध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारण्यात आला की, भारताशी चर्चा होण्याच्या बाजूने आहात की विरोधात ? 
 
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 31 टक्के लोकांनी चर्चेला विरोध केला होता, तर एक टक्का लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.