शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

68 टक्के पाकिस्तानी नागरिक भारताशी चर्चा करण्याच्या बाजूने

By admin | Updated: January 7, 2017 08:02 IST

एका सर्व्हेनुसार 68 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - उरी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिंकल स्ट्राईक यामुळे भारत - पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे पाकिस्तान सरकार चर्चा करण्याऐवजी रोज शस्त्रसंधी उल्लंघन करुन चर्चेमध्ये अडथळे आणत असताना पाकिस्तानी नागरिकांना मात्र भारतासोबत चर्चा व्हावी असं वाटत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार 68 टक्के पाकिस्तानी नागरिकांनी भारताशी चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 
 
68 टक्के पाकिस्तानी नागरिक भारताशी चर्चा व्हावी या मताचे असून यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे.  गिलानी रिसर्च फाऊंडेशनने हा सर्व्हे केला आहे. 
 
या सर्व्हेमध्ये 1835 लोक सहभागी झाले होते. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता. देशातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. पंजाब, सिंध, बलुचिस्तान प्रांतामध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारण्यात आला की, भारताशी चर्चा होण्याच्या बाजूने आहात की विरोधात ? 
 
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 31 टक्के लोकांनी चर्चेला विरोध केला होता, तर एक टक्का लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.