शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

५४ मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात

By admin | Updated: March 23, 2015 02:21 IST

श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे.

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे. मच्छीमारांच्या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचे शिष्टमंडळ भारतात येण्याच्या आधी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाचा प्रवक्ता कमांडर इंडिका सिल्व्हा यांनी यासंदर्भात बोलताना दिलेल्या माहितीनुसार कांकेसंतुराई येथे २१ मच्छीमार व पाच बोटी जप्त करण्यात आल्या असून, इतर ३३ मच्छीमारांना तलाईमनार येथे अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या मच्छीमारांना विविध मच्छी निरीक्षण कार्यालयांत पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीआधी श्रीलंकेने ८६ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. १९८७ नंतर मोदी हे श्रीलंकेला भेट देणारे पहिले भारतीय नेते होते. श्रीलंकेचे शिष्टमंडळ मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात भारतात येत आहे. परस्परांच्या सागरी सीमा ओलांडणे, एकमेकांच्या जलसीमेवर हल्ले करणे यासारखे मुद्दे या चर्चेत अंतर्भावित आहेत. श्रीलंकेची मच्छीमार संघटना व भारताची संघटना यात २४ व २५ मार्च रोजी चेन्नई येथे बैठक होत आहे. दोन्ही देशांच्या मच्छीमार संघटनांची बैठक तिसऱ्यांदा होत असून, त्यात पाक खाडी व किनारा येथील मासेमारीसंदर्भात तोडगा काढण्यावर चर्चा झाली आहे. अशी पहिली बैठक २७ जानेवारी २०१४ रोजी चेन्नई येथे झाली होती, तर दुसरी बैठक १२ मे २०१४ रोजी कोलंबो येथे झाली होती. श्रीलंकेच्या मच्छीमारांचे म्हणणे असे आहे की, भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी करतात व विनाशी पद्धतीने मच्छीमारी करतात, हे स्वीकारण्यासारखे नाही; पण भारतीय मच्छीमार व तामिळनाडू सरकारच्या मते कच्छातिवू बेटाचा परिसर व पाक खाडी ही परंपरागत मासेमारीची जागा असल्याने श्रीलंकेने ती विभागून वापरली पाहिजे. श्रीलंका भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली असून, हा प्रश्न मच्छीमारांच्या रोजीरोटीशी संबंधित असल्याने मानवी दृष्टिकोन ठेवून तो सोडवावा, असे ठरले आहे.