शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

५४ मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात

By admin | Updated: March 23, 2015 02:21 IST

श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे.

कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे. मच्छीमारांच्या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचे शिष्टमंडळ भारतात येण्याच्या आधी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाचा प्रवक्ता कमांडर इंडिका सिल्व्हा यांनी यासंदर्भात बोलताना दिलेल्या माहितीनुसार कांकेसंतुराई येथे २१ मच्छीमार व पाच बोटी जप्त करण्यात आल्या असून, इतर ३३ मच्छीमारांना तलाईमनार येथे अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या मच्छीमारांना विविध मच्छी निरीक्षण कार्यालयांत पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीआधी श्रीलंकेने ८६ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. १९८७ नंतर मोदी हे श्रीलंकेला भेट देणारे पहिले भारतीय नेते होते. श्रीलंकेचे शिष्टमंडळ मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात भारतात येत आहे. परस्परांच्या सागरी सीमा ओलांडणे, एकमेकांच्या जलसीमेवर हल्ले करणे यासारखे मुद्दे या चर्चेत अंतर्भावित आहेत. श्रीलंकेची मच्छीमार संघटना व भारताची संघटना यात २४ व २५ मार्च रोजी चेन्नई येथे बैठक होत आहे. दोन्ही देशांच्या मच्छीमार संघटनांची बैठक तिसऱ्यांदा होत असून, त्यात पाक खाडी व किनारा येथील मासेमारीसंदर्भात तोडगा काढण्यावर चर्चा झाली आहे. अशी पहिली बैठक २७ जानेवारी २०१४ रोजी चेन्नई येथे झाली होती, तर दुसरी बैठक १२ मे २०१४ रोजी कोलंबो येथे झाली होती. श्रीलंकेच्या मच्छीमारांचे म्हणणे असे आहे की, भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी करतात व विनाशी पद्धतीने मच्छीमारी करतात, हे स्वीकारण्यासारखे नाही; पण भारतीय मच्छीमार व तामिळनाडू सरकारच्या मते कच्छातिवू बेटाचा परिसर व पाक खाडी ही परंपरागत मासेमारीची जागा असल्याने श्रीलंकेने ती विभागून वापरली पाहिजे. श्रीलंका भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली असून, हा प्रश्न मच्छीमारांच्या रोजीरोटीशी संबंधित असल्याने मानवी दृष्टिकोन ठेवून तो सोडवावा, असे ठरले आहे.