शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

नेपाळमध्ये भूकंपात ५,0०० ठार; भारतात धक्के

By admin | Updated: April 26, 2015 02:36 IST

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये शनिवारी सकाळी लागोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हाहाकार घडविला.

काठमांडू/ नवी दिल्ली : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये शनिवारी सकाळी लागोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हाहाकार घडविला. या महाकाय भूकंपात सुमारे पाच हजार नागरिक मृत्युमुखी पडले. नेपाळची राजधानी काठमांडू व इतर शहरांतील शेकडो इमारती उद््ध्वस्त झाल्या. या भूकंपाने भारतातही ५१ बळी घेतले. नेपाळच्या ७५ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये हानी१०० वर्षांहून जुना धरहरा टॉवर व दरबार चौकातील वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्तप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचीही झाली पडझडभारताकडून नेपाळला शक्य ती सर्व मदत तातडीने देण्याचे निर्देशहवाई दलाच्या विमानाने ५५ भारतीयांना आणले मायदेशी; आणखी २०० जण रविवारी परतणारएव्हरेस्टवर हिमस्खलन; बेस कॅम्पवरील १८ गिर्यारोहकही ठारसायंकाळपर्यंत नेपाळला ५ ते ६.६ तीव्रतेचे तब्बल १६ आफ्टरशॉक्ससंूपर्ण नेपाळ शोकग्रस्त; जागोजागी आक्रोश, जखमींसाठी धावळपटॉवरखाली २०० मृतदेहकाठमांडूच्या मध्य वस्तीत असलेला धरहरा टॉवर जमीनदोस्त झाला. काठमांडूचे नयनरम्य दर्शन घेण्यास हजारो नागरिक या टॉवरला भेट देत. या भूकंपाने ५०.५ मीटर उंचीच्या या ऐतिहासिक टॉवरखाली सुमारे २०० मृतदेह आढळले. महाराष्ट्रातील 600पर्यटक अडकलेनवी दिल्ली : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ६०० पर्यटक असून, ते सारेच सुरक्षित असल्याचे सरकारी स्तरावर सांगण्यात येत आहे. मुंबई, नागपूर व पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनास गेले होते. याशिवाय खासगी पर्यटन कंपन्यांकडून आणि कुटुंबांसह पर्यंटनासाठी गेलेल्यांचा शोध बारत सरकारच्या मदतीने राज्य सरकारचे अधिकारी घेत आहेत.राज्य शासनाची हेल्पलाइनभूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ०२२-२२०२७९९० ही हेल्पलाइन सुरू केली. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल़ केंद्र सरकारच्या यंत्रणेशीही सातत्याने संपर्क राखला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.