शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

इराकमध्ये ४० भारतीयांचे अपहरण ?

By admin | Updated: June 18, 2014 10:55 IST

इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन टीम
बगदाद, दि. १८- इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. मात्र या सर्वांशी सध्या संपर्क होत नसून ते बेपत्ता झाले आहेत अशी सावध प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 
इराकमध्ये शिया सरकार व सुन्नी जिहाद्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून यामुळे इराकमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल -शाम  (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. तेल विहीरींची नैसर्गिक देणगी लाभलेल्या मोसूल शहरावरही आयएसआएस या संघटनेने ताबा मिळवला आहे. मोसूलमध्ये भारतातील ४० कर्मचारी एका बांधकाम साईटवर काम करत होते. यासर्वांचे दहशतवाद्यांनी अपहरण झाल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र या नागरिकांशी अद्याप संपर्क झालेला नसून ते बेपत्ता आहे. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय नागरिकांच्या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसून अपह्रत नागरिकांच्या सुटकेसाठी कोणती मागणीही करण्यात आलेली नाही.