शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इराकमधील ४० भारतीयांची हत्या झालेली नाही - सुषमा स्वराज

By admin | Updated: November 28, 2014 13:04 IST

इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे. या भारतीयांच्या कुटुंबियांशी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी तीन अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इराकमध्ये ४० भारतीयांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. राज्यसभेतही या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी या भारतीयांची हत्या झाल्याचे म्हटले असता सुषमा स्वराज यांनी त्या शब्दावर आक्षेप घेतला. हत्या ऐवजी कथीत हत्या म्हणा अशी विनंती स्वराज यांनी सर्व खासदारांनी केली. यानंतर मायावती व अन्य पक्षांच्या खासदारांनी या भारतीयांबद्दल केंद्र सरकारने माहिती द्यावी अशी मागणी केली. यानंतर सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत उत्तर दिले. इराकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ४० भारतीय अडकल्याचे वृत्त वारंवार झळकत असल्याचे स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. यापैकी हरसिम्रत मिश्र हा भारतीय तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. तो सध्या भारत सरकारच्या देखरेखीखाली असल्याचे स्वराज यांनी सांगितले. 

भारतीयांची हत्या झाल्याचा दावा करणारे बांग्लादेशी नागरिक आणि मिश्र यांच्या जबाबात तफावत असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. 'भारतीयांची हत्या झाल्याचे बांग्लादेशी कामगारांनी म्हटले आहे. पण भारतीय व बांग्लादेशी कामगारांना दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले होते. म्हणजेच बांग्लादेशी कामगारांनी भारतीयांची हत्या करताना बघितले नाही हे स्पष्ट होते. आम्हाला सहा सूत्रांनी  ते भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले असून गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणूनच आम्ही त्यांची नावे जाहीर करत नाही असे स्वराज यांनी म्हटले आहे.