शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इराकमधील ४० भारतीयांची हत्या झालेली नाही - सुषमा स्वराज

By admin | Updated: November 28, 2014 13:04 IST

इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे. या भारतीयांच्या कुटुंबियांशी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी तीन अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इराकमध्ये ४० भारतीयांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. राज्यसभेतही या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी या भारतीयांची हत्या झाल्याचे म्हटले असता सुषमा स्वराज यांनी त्या शब्दावर आक्षेप घेतला. हत्या ऐवजी कथीत हत्या म्हणा अशी विनंती स्वराज यांनी सर्व खासदारांनी केली. यानंतर मायावती व अन्य पक्षांच्या खासदारांनी या भारतीयांबद्दल केंद्र सरकारने माहिती द्यावी अशी मागणी केली. यानंतर सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत उत्तर दिले. इराकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ४० भारतीय अडकल्याचे वृत्त वारंवार झळकत असल्याचे स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. यापैकी हरसिम्रत मिश्र हा भारतीय तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. तो सध्या भारत सरकारच्या देखरेखीखाली असल्याचे स्वराज यांनी सांगितले. 

भारतीयांची हत्या झाल्याचा दावा करणारे बांग्लादेशी नागरिक आणि मिश्र यांच्या जबाबात तफावत असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. 'भारतीयांची हत्या झाल्याचे बांग्लादेशी कामगारांनी म्हटले आहे. पण भारतीय व बांग्लादेशी कामगारांना दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले होते. म्हणजेच बांग्लादेशी कामगारांनी भारतीयांची हत्या करताना बघितले नाही हे स्पष्ट होते. आम्हाला सहा सूत्रांनी  ते भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले असून गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणूनच आम्ही त्यांची नावे जाहीर करत नाही असे स्वराज यांनी म्हटले आहे.