शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

इराकमधील ४० भारतीयांची हत्या झालेली नाही - सुषमा स्वराज

By admin | Updated: November 28, 2014 13:04 IST

इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे. या भारतीयांच्या कुटुंबियांशी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी तीन अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इराकमध्ये ४० भारतीयांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. राज्यसभेतही या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी या भारतीयांची हत्या झाल्याचे म्हटले असता सुषमा स्वराज यांनी त्या शब्दावर आक्षेप घेतला. हत्या ऐवजी कथीत हत्या म्हणा अशी विनंती स्वराज यांनी सर्व खासदारांनी केली. यानंतर मायावती व अन्य पक्षांच्या खासदारांनी या भारतीयांबद्दल केंद्र सरकारने माहिती द्यावी अशी मागणी केली. यानंतर सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत उत्तर दिले. इराकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ४० भारतीय अडकल्याचे वृत्त वारंवार झळकत असल्याचे स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. यापैकी हरसिम्रत मिश्र हा भारतीय तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. तो सध्या भारत सरकारच्या देखरेखीखाली असल्याचे स्वराज यांनी सांगितले. 

भारतीयांची हत्या झाल्याचा दावा करणारे बांग्लादेशी नागरिक आणि मिश्र यांच्या जबाबात तफावत असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. 'भारतीयांची हत्या झाल्याचे बांग्लादेशी कामगारांनी म्हटले आहे. पण भारतीय व बांग्लादेशी कामगारांना दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले होते. म्हणजेच बांग्लादेशी कामगारांनी भारतीयांची हत्या करताना बघितले नाही हे स्पष्ट होते. आम्हाला सहा सूत्रांनी  ते भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले असून गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणूनच आम्ही त्यांची नावे जाहीर करत नाही असे स्वराज यांनी म्हटले आहे.