शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

२१ वे शतक आशियाई देशांचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 21, 2015 12:30 IST

आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले

ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २१ - भारत व आसिआन देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले. मलेशिया व सिंगापूरच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान मोदी आज दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेत बोलत होते. 
आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले आशियाई देश एकत्र येऊन आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकतात, २१ वे शतक हे आशियाचे बनवण्याची जबाबादारी भारताची अाहे, असे ते म्हणाले.
भारताचा आर्थइक आलेख पाहता, आम्ही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पहायला मिळेल अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी  आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. 
गेल्या १८ महिन्यात देशाचा विकास तर झालाच पण महागाई कमी झाली आहे. गेल्या वर्षभरात  जन-धन योजनेअंतर्गत तब्बल १९ कोटी नागरिकांची बँक खाती सुरू करण्यात आली आहेत. भारताला वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अर्थव्यवस्थेला मजबूती येत असून, कृषी क्षेत्रच आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, सध्या दररोज  १४ ते २३ किमी अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांची वर्षांची परंपरा मोडीत काढून आम्ही भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याचेही मोदींनी नमूद केले.