शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

२१ वे शतक आशियाई देशांचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 21, 2015 12:30 IST

आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले

ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २१ - भारत व आसिआन देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले. मलेशिया व सिंगापूरच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान मोदी आज दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेत बोलत होते. 
आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले आशियाई देश एकत्र येऊन आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकतात, २१ वे शतक हे आशियाचे बनवण्याची जबाबादारी भारताची अाहे, असे ते म्हणाले.
भारताचा आर्थइक आलेख पाहता, आम्ही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पहायला मिळेल अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी  आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. 
गेल्या १८ महिन्यात देशाचा विकास तर झालाच पण महागाई कमी झाली आहे. गेल्या वर्षभरात  जन-धन योजनेअंतर्गत तब्बल १९ कोटी नागरिकांची बँक खाती सुरू करण्यात आली आहेत. भारताला वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अर्थव्यवस्थेला मजबूती येत असून, कृषी क्षेत्रच आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, सध्या दररोज  १४ ते २३ किमी अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांची वर्षांची परंपरा मोडीत काढून आम्ही भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याचेही मोदींनी नमूद केले.