शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

२१वे शतक आशियाचे - पंतप्रधान

By admin | Updated: November 22, 2015 01:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण

क्वालालम्पूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आसियानशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यासह प्रादेशिक वाद शांततापूर्ण रीतीने मिटविण्याची गरजही अधोरेखित केली. २१ वे शतक आशियाई देशांचेच असेल, असा विश्वास व्यक्त करून मोदींनी जगाचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचे नमूद केले. मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले मोदी शनिवारी दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसियान) शिखर परिषदेत बोलत होते. मोदी म्हणाले की, दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठे आव्हान बनला असून, आम्हा सर्वांना प्रभावित करीत आहे. भारत व आसियान देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे मोदी म्हणाले. भारताचा आर्थिक आलेख पाहता, आपण पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पाहायला मिळेल, अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले. गेल्या १८ महिन्यांत देशाचा विकास तर झालाच; पण महागाईही कमी झाली आहे. कर उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)