शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

कोच रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी, हॉकी इंडियाकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:49 IST

हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील.

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील. हॉकी इंडियाच्या हाय परफॉर्मन्स आणि विकास समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.हॉकी इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख हरविंदरसिंग म्हणाले, ‘आम्ही २०१६ आणि २०१७ या मोसमातील पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीवर समाधानी नाही. आशियातील विजय हा यशाचा मापदंड होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. आम्हाला गेली दोन वर्षे आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. यशासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कोचिंगची सध्याची पद्धत एका मर्यादेपेक्षा अधिक यश मिळवून देऊ शकत नाही. यावर लगेचतोडगा काढायची गरज आहे.बदल एका रात्रीतून होत नाही.२०१८ चे आशियाड, विश्वकपआणि २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये देदीप्यमान यशासाठी आमूलाग्र बदल आवश्यक आहेत.’‘वारंवारकोच बदलणे नुकसानदायक’नवी दिल्ली : रोलँट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीवर आश्चर्य व्यक्त करून भारतीय हॉकी संघाचे माजी कोच जोस ब्रासा यांनी वारंवार कोच बदलणे भारतीय संघाच्या हिताचे नसल्याचे म्हटले आहे.२००९-१० या मोसमात भारताचे कोच राहिलेले ब्रासा यांनी स्पेनमधून वृत्तसंस्थेशी बोलताना ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीबाद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘रोलँट जगातील सर्वोत्कृष्ट कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत चांगला खेळत होता. त्यांचा पर्याय शोधणे कठीण असेल.’’ब्रासा यांच्यासोबतदेखील हॉकी इंडियाने दोन वर्षांचा करार केला होता; पण ग्वांग्झू एशियाड (२०१०)नंतर त्यांची हकालपट्टी झाली होती. युक्रेनच्या राष्टÑीय महिला संघाचे सल्लागार असलेले ब्रासा म्हणाले, ‘‘वारंवार कोच बदलल्याने संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो.’’हॉकी इंडियात खेळाची पार्श्वभूमी लाभलेल्या लोकांचा अभाव, हीच भारतात मुख्य समस्या असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.हॉकी चालविणाºयांना खेळाची माहिती नाही. जगभर होतअसलेल्या बदलाची माहिती नसणे, हे मूळ कारण आहे. भारताला देशीनव्हे, तर विदेशी कोचचीच गरज असल्याचे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिले.भारतात एकही हॉकी विद्यापीठ नाही. विदेशी कोच आधुनिक माहितीसह अनुभव सोबत घेऊन येतो, असे त्यांनी स्वत:चा मुद्दा पुढे रेटताना सांगितले. भारतात हॉकी प्रतिभेची उणीव नाही; पण त्यांना आधुनिक प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक नाहीत. भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार होण्यासाठी कोचला अधिक वेळ देणे गरजेचे आहे, असे ब्रासा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)गेल्या काही वर्षांत सात कोच बदलले गेले. नेदरलँड्सचे पॉल वॉन अ‍ॅस, आॅस्ट्रेलियाचे टेरी वॉल्श, मायकेल नोब्स आणि रिक चार्ल्सवर्थ यांनादेखील वादग्रस्त स्थितीत निरोप देण्यात आला. विश्व दर्जाच्या संघबांधणीसाठी दीर्घ काळासाठी कोचची नियुक्ती व्हायला हवी. ही ‘जादूची छडी’ नाही. खेळाडूंना समजून घ्यायला बराच वेळ लागतो.-जोस ब्रासा, माजी कोच भारत