शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

By admin | Updated: January 30, 2015 14:53 IST

येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.

 हिंगोली : /कळमनुरी/ तालुक्यातील येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.येडशी येथील यात्रेत कुस्त्यांची दंगल सुरू असताना हा प्रकार घडला होता. आदल्या दिवशी पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना 'प्रसाद' दिला. दुसर्‍या दिवशी हीच मंडळी पोलिसांना प्रसन्न झाली. त्यांनी चक्क पोलिसांकडून सव्याज वसुली केली. ज्यांनी हे कृत्य केले त्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. मात्र पोलिसांची त्यांना कुठलीच भीती नाही, हे तेव्हाच अधोरेखित झाले होते. ती भीती का नाही, हे तपासाची गती पाहून लक्षात येत आहे. दुसर्‍या दिवशी गावात आयत्याच सापडलेल्या पाच जणांना पकडले अन् तेवढय़ावरच समाधान मानावे लागले. हा भाग संवेदनशील आहे. पोलिस ठाण्याचा आवाकाही मोठा आहे. शिवाय एकामागून एक प्रकरणांचा धडाकाही तेथेच सुरू आहे. इतर प्रकरणांच्या तपासात पोलिसांची गती मंद असते. निदान त्यांनाच कोणी बकलून काढल्यावर तरी जोमात चक्रे फिरतील, असे अपेक्षित होते. मात्र कातडी गेंड्यांचीच. त्यावर चार-दोन दंडे पडलेही तर फरक काय तो पडणार? असे लोकांना वाटत आहे. तर जणू काही घडलेच नाही, या थाटात पोलिस वावरत आहेत. यात राजकीय दबावाचाही गंध येत आहे. परंतु कर्तव्यदक्षतेचा आव आणणारे व कुठल्याही दबावाला बळी पडत नसल्याचे सांगणारे पोलिस दल त्यामुळे तर चुप्पी साधून नाही? असाही प्रश्न आहे. /(जिल्हा प्रतिनिधी) कुस्त्यांच्या दंगली यात्रांतून बाद! येडशीत कुस्त्यांची दंगल सुरू असताना घडलेल्या प्रकारामुळे वारंगा फाटा परिसरातील अनेक ठिकाणच्या यात्रांतून कुस्त्यांच्या दंगलीच बाद झाल्या आहेत. त्यात वारंगा येथील स्पर्धेचाही समावेश आहे. तोंडापूर, कुर्तडी येथेही तेच घडले. विशेष म्हणजे काही ठिकाणी मल्लच भीतीपोटी आले नाही तर काही ठिकाणी आयोजकांनी नको ती झंझट म्हणून या स्पर्धा घेतल्या नाहीत. केवळ एका घटनेमुळे या स्पर्धांवर परिणाम होत असेल तर ही बाब लाजीरवाणी आहे. पोलिस दलाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. येडशीत गमावलेला लोकांचा विश्‍वास परत मिळविण्यासाठी पोलिसांना मात्र कृतीतून सिद्धता दाखवावी लागणार आहे.