शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

By admin | Updated: January 30, 2015 14:53 IST

येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.

 हिंगोली : /कळमनुरी/ तालुक्यातील येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.येडशी येथील यात्रेत कुस्त्यांची दंगल सुरू असताना हा प्रकार घडला होता. आदल्या दिवशी पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना 'प्रसाद' दिला. दुसर्‍या दिवशी हीच मंडळी पोलिसांना प्रसन्न झाली. त्यांनी चक्क पोलिसांकडून सव्याज वसुली केली. ज्यांनी हे कृत्य केले त्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. मात्र पोलिसांची त्यांना कुठलीच भीती नाही, हे तेव्हाच अधोरेखित झाले होते. ती भीती का नाही, हे तपासाची गती पाहून लक्षात येत आहे. दुसर्‍या दिवशी गावात आयत्याच सापडलेल्या पाच जणांना पकडले अन् तेवढय़ावरच समाधान मानावे लागले. हा भाग संवेदनशील आहे. पोलिस ठाण्याचा आवाकाही मोठा आहे. शिवाय एकामागून एक प्रकरणांचा धडाकाही तेथेच सुरू आहे. इतर प्रकरणांच्या तपासात पोलिसांची गती मंद असते. निदान त्यांनाच कोणी बकलून काढल्यावर तरी जोमात चक्रे फिरतील, असे अपेक्षित होते. मात्र कातडी गेंड्यांचीच. त्यावर चार-दोन दंडे पडलेही तर फरक काय तो पडणार? असे लोकांना वाटत आहे. तर जणू काही घडलेच नाही, या थाटात पोलिस वावरत आहेत. यात राजकीय दबावाचाही गंध येत आहे. परंतु कर्तव्यदक्षतेचा आव आणणारे व कुठल्याही दबावाला बळी पडत नसल्याचे सांगणारे पोलिस दल त्यामुळे तर चुप्पी साधून नाही? असाही प्रश्न आहे. /(जिल्हा प्रतिनिधी) कुस्त्यांच्या दंगली यात्रांतून बाद! येडशीत कुस्त्यांची दंगल सुरू असताना घडलेल्या प्रकारामुळे वारंगा फाटा परिसरातील अनेक ठिकाणच्या यात्रांतून कुस्त्यांच्या दंगलीच बाद झाल्या आहेत. त्यात वारंगा येथील स्पर्धेचाही समावेश आहे. तोंडापूर, कुर्तडी येथेही तेच घडले. विशेष म्हणजे काही ठिकाणी मल्लच भीतीपोटी आले नाही तर काही ठिकाणी आयोजकांनी नको ती झंझट म्हणून या स्पर्धा घेतल्या नाहीत. केवळ एका घटनेमुळे या स्पर्धांवर परिणाम होत असेल तर ही बाब लाजीरवाणी आहे. पोलिस दलाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. येडशीत गमावलेला लोकांचा विश्‍वास परत मिळविण्यासाठी पोलिसांना मात्र कृतीतून सिद्धता दाखवावी लागणार आहे.