शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची कामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:41 IST

जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात महावितरणमार्फत दरवर्षी कोट्यवधींची कामे केली जात आहेत. मात्र या सर्व कामांवर नांदेड येथील इन्फ्राच्या अधीक्षक अभियंत्यांकडून नियंत्रण ठेवण्यात येते. स्थानिक ठिकाणी त्यांचे अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाला प्रस्ताव तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीतील कागदी घोडे नाचविणे यापलिकडे सवडही मिळत नाही. तर नांदेड येथील यंत्रणा कधीतरीच या कामांच्या तपासणीला येते. त्यामुळे कंत्राटदारांच्याच भरवशावर ही कामे होतात. यापूर्वी इन्फ्राच्या कामांमध्ये अनेक गावांतील रोहित्रच गायब असल्याचे समोर आले होते. शिवाय अनेक गावांतील वीजवाहिन्याच अजूनही ओढलेल्या नाहीत. एका गावाचे नाव सांगून दुस-याच गावात कामे केल्याचेही प्रकार घडले. यात सबकंत्राटदारांनीही मोठी करामत दाखविली होती. मात्र महावितरणने तरीही कोणताच बोध घेतला नाही. आता श्रावण इलेक्ट्रिक या कंत्राटदारामार्फत ही कामे केली जात आहेत. मात्र या कामांना गतीच नाही. खुद्द जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या कामांसाठी अनेकदा सूचना दिल्या आहेत. ६ जानेवारी २0१७ रोजी यासाठी निविदा निघाल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र आता दहा महिन्यांनंतर शहरात काही ठिकाणी डीपीचे फ्युजबॉक्स, किरकोळ दुरुस्तीचीच कामे झाल्याचे दिसत आहे. ही कामेही सर्वच भागात पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी खांब सरळ करणे, बदलणे, तारा बदलणे या कामांची सुरुवातही झाली नाही. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहरात भूमिगत वीजवाहिन्याचे काम होणार आहे. मात्र या योजनेचाच पत्ता नाही.