शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:52 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत भरघोस उद्दिष्ट मिळालेले आहे. मात्र ही कामे होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकदा ओरड होत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक सभा, बैठकीत यावरून तोंडसुख घेत आहेत. मात्र शासन व प्रशासन दोन्हीही हलायला तयार नाहीत. आधी कामे मंजूर होत नसल्याची बोंब होती. आता मंजूर कामांचा श्रीगणेशाच होत नसल्याची बोंब आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांचीही तीच गत आहे. दहा हजार विहिरींचे उद्दिष्ट असताना ग्रामसभेतून केवळ ९९७0 लाभार्थी निवड झाली. ३९२४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २३८८ कामे चालू आहेत. तर पूर्ण ५४ कामे झाली आहेत. १४८२ कामे सुरूच नाहीत. व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टात ६८७ अर्ज आले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ३ कामेच सुरू झाली आहेत. नाडेप कंपोस्टिंगची ७६८ पैकी ४६६ कामे मंजूर होती. यापैकी १५ सुरू असून २ पूर्ण झाली आहेत. शौचालयाच्या ८७२ पैकी २२६ कामांना मंजुरी दिली असताना १२0 कामेच सुरू आहेत.शौषखड्ड्यांच्या १८६९ पैकी ८८१ कामांना मंजुरी दिली होती. ४८७ कामेच सुरू झाली. समृद्ध ग्राम योजनेत ७0५ पैकी २६९ कामांना मंजुरु दिली होती. यापैकी २६१ कामे सुरू झाली आहेत.या योजनेतील कामे सुरू करण्यासाठी सूचनांवर सूचना दिल्या जात आहेत. मात्र तरीही कामे सुरू होत नाहीत. आता पावसाळ्यात काहीच कामे करणे शक्य आहे. यात फळबाग लागवडीचे १८00 चे उद्दिष्ट असून ३६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १४८ कामेच सुरू झाली आहेत.रोपवाटिकेच्या ६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातील ४ कामे पूर्ण तर ५६ सुरू आहेत. वृक्षलागवडीच्या ३६ प्रस्तावांपैकी २३ ला मंजुरी दिली होती. यापैकी १८ कामे सुरू तर पाच कामे अजूनही सुरू झाली नाहीत.शेततळ्यांचे उद्दिष्ट ५६00 एवढे आहे. यात ५३२ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव असून ३२२ ला प्रशासकीय मंजुरी दिली. एकही काम सुरू नाही. समृद्ध गाव तलावाचा तर प्रस्तावच नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना