शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:52 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत भरघोस उद्दिष्ट मिळालेले आहे. मात्र ही कामे होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकदा ओरड होत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक सभा, बैठकीत यावरून तोंडसुख घेत आहेत. मात्र शासन व प्रशासन दोन्हीही हलायला तयार नाहीत. आधी कामे मंजूर होत नसल्याची बोंब होती. आता मंजूर कामांचा श्रीगणेशाच होत नसल्याची बोंब आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांचीही तीच गत आहे. दहा हजार विहिरींचे उद्दिष्ट असताना ग्रामसभेतून केवळ ९९७0 लाभार्थी निवड झाली. ३९२४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २३८८ कामे चालू आहेत. तर पूर्ण ५४ कामे झाली आहेत. १४८२ कामे सुरूच नाहीत. व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टात ६८७ अर्ज आले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ३ कामेच सुरू झाली आहेत. नाडेप कंपोस्टिंगची ७६८ पैकी ४६६ कामे मंजूर होती. यापैकी १५ सुरू असून २ पूर्ण झाली आहेत. शौचालयाच्या ८७२ पैकी २२६ कामांना मंजुरी दिली असताना १२0 कामेच सुरू आहेत.शौषखड्ड्यांच्या १८६९ पैकी ८८१ कामांना मंजुरी दिली होती. ४८७ कामेच सुरू झाली. समृद्ध ग्राम योजनेत ७0५ पैकी २६९ कामांना मंजुरु दिली होती. यापैकी २६१ कामे सुरू झाली आहेत.या योजनेतील कामे सुरू करण्यासाठी सूचनांवर सूचना दिल्या जात आहेत. मात्र तरीही कामे सुरू होत नाहीत. आता पावसाळ्यात काहीच कामे करणे शक्य आहे. यात फळबाग लागवडीचे १८00 चे उद्दिष्ट असून ३६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १४८ कामेच सुरू झाली आहेत.रोपवाटिकेच्या ६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातील ४ कामे पूर्ण तर ५६ सुरू आहेत. वृक्षलागवडीच्या ३६ प्रस्तावांपैकी २३ ला मंजुरी दिली होती. यापैकी १८ कामे सुरू तर पाच कामे अजूनही सुरू झाली नाहीत.शेततळ्यांचे उद्दिष्ट ५६00 एवढे आहे. यात ५३२ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव असून ३२२ ला प्रशासकीय मंजुरी दिली. एकही काम सुरू नाही. समृद्ध गाव तलावाचा तर प्रस्तावच नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना