शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:52 IST

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत भरघोस उद्दिष्ट मिळालेले आहे. मात्र ही कामे होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकदा ओरड होत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक सभा, बैठकीत यावरून तोंडसुख घेत आहेत. मात्र शासन व प्रशासन दोन्हीही हलायला तयार नाहीत. आधी कामे मंजूर होत नसल्याची बोंब होती. आता मंजूर कामांचा श्रीगणेशाच होत नसल्याची बोंब आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांचीही तीच गत आहे. दहा हजार विहिरींचे उद्दिष्ट असताना ग्रामसभेतून केवळ ९९७0 लाभार्थी निवड झाली. ३९२४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २३८८ कामे चालू आहेत. तर पूर्ण ५४ कामे झाली आहेत. १४८२ कामे सुरूच नाहीत. व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टात ६८७ अर्ज आले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ३ कामेच सुरू झाली आहेत. नाडेप कंपोस्टिंगची ७६८ पैकी ४६६ कामे मंजूर होती. यापैकी १५ सुरू असून २ पूर्ण झाली आहेत. शौचालयाच्या ८७२ पैकी २२६ कामांना मंजुरी दिली असताना १२0 कामेच सुरू आहेत.शौषखड्ड्यांच्या १८६९ पैकी ८८१ कामांना मंजुरी दिली होती. ४८७ कामेच सुरू झाली. समृद्ध ग्राम योजनेत ७0५ पैकी २६९ कामांना मंजुरु दिली होती. यापैकी २६१ कामे सुरू झाली आहेत.या योजनेतील कामे सुरू करण्यासाठी सूचनांवर सूचना दिल्या जात आहेत. मात्र तरीही कामे सुरू होत नाहीत. आता पावसाळ्यात काहीच कामे करणे शक्य आहे. यात फळबाग लागवडीचे १८00 चे उद्दिष्ट असून ३६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १४८ कामेच सुरू झाली आहेत.रोपवाटिकेच्या ६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातील ४ कामे पूर्ण तर ५६ सुरू आहेत. वृक्षलागवडीच्या ३६ प्रस्तावांपैकी २३ ला मंजुरी दिली होती. यापैकी १८ कामे सुरू तर पाच कामे अजूनही सुरू झाली नाहीत.शेततळ्यांचे उद्दिष्ट ५६00 एवढे आहे. यात ५३२ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव असून ३२२ ला प्रशासकीय मंजुरी दिली. एकही काम सुरू नाही. समृद्ध गाव तलावाचा तर प्रस्तावच नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना