शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कामगारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:56 IST

हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन ...

हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुका बीजगुणन केंद्र फळरोपवाटिका केंद्रावरील रोजंदारी कामगारांचे वेतन १९ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कर्जबाजारीही झालो आहोत. कामगारांनी वेळोवेळी वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्या ,त्यांच्यासमोर समस्या मांडल्या, मात्र काही उपयोग झाला नाही. फरक मिळावा व तो वेतनात समाविष्ट करावा, वसमत, बासंबा, आखाडा बाळापूर या वनक्षेत्रावरील कामगारांचे प्रश्न, किमान वेतन कायद्याखाली असलेल्या तरतुदीप्रमाणे हजेरी कार्ड, ओळखपत्र व वेतन स्लिप कामगारांना द्यावी अशा विविध मागण्या केल्या आहेत. ५ मार्चपासून धरणे सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा आंदोलकांनी निर्धार केला आहे. आंदोलनात नागनाथ स्वामी, सुशीलाबाई जबडे, रमाबाई गटकवाढ, पदमिनाबाई रणबावळे, तुळशीराम लक्ष्मण भाग्यवान, शेषराव गडबडे, सय्यद मेहबूब सय्यद नासिर यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाAgriculture Sectorशेती क्षेत्र