शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

नवलगव्हाण साठवण तलावाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण परिसरातील साठवण तलावाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तलावात मुबलक पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील ...

हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण परिसरातील साठवण तलावाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तलावात मुबलक पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण परिसरामध्ये २०१७ मध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने साठवण तलावाचे काम हाती घेण्यात आले. तलावात नवलगव्हाण, भांडेगाव, साटंबा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, परिसरातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, या अपेक्षेने परिसरातील शेतकरी आनंदित झाले होते. परंतु, तलावाचे काम हाती घेऊनही अद्याप तलावाचे काम पूर्ण झाले नाही. तलावाच्या पिंचींगचे काम, साईड रस्ता, कालवा आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे यावर्षी पाऊस जास्त होऊनसुद्धा तलावात मुबलक पाणीसाठा झाला नाही. त्यात जानेवारीपासूनच तलाव कोरडा पडण्यास सुरुवात होते. आता तलावात पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अभियंता वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता, तलावाचे काम करणाऱ्या गुतेदाराला तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात महिन्यापूर्वी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाखो रुपये खर्चूनही शेतकऱ्यांना अद्याप म्हणावा तसा तलावाचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे दिसून येत आहे.

४९० हेक्टर सिंचन क्षमता...

नवलगव्हाण येथे उभारण्यात येणाऱ्या सिंचन तलावाची माथा पातळी ४७४.२०० मीटर असून महत्तम पातळी ४७२.७०० मीटर आहे. तसेच पाणी संचय पातळी ४७१.५०० मीटर असलेल्या या तलावातील पाणीसाठवण क्षमता २.७३२ दलघमी आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यास परिसरातील ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणीच उपलब्ध झाले नाही.