शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

कर्मकांडाच्या अवडंबरातून स्त्रियांनी बाहेर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. ...

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. या संघर्षातून महिलांनी प्रेरणा घेवून विज्ञानवादी जगात जगणे गरजेचे आहे, पण आजही २१ व्या शतकातील स्वत:ला सुशिक्षित समजणाऱ्या अनेक महिला कर्मकांडात बुडालेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर महिलांनी यातून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन व्याख्यात्या सीमाताई बोके यांनी केले. यंदा कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजवर व्याख्यानाचे प्रसारण करण्यात आले. तत्पूर्वी येथील राजे संभाजी महाविद्यालयात मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीताई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष ज्योतीताई कोथळकर या होत्या. उद्‌घाटक कर सहाय्यक सरिता कदम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सदस्या वंदनाताई आखरे, जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर, प्रायोजक वर्षाताई सरनाईक यांची उपस्थिती होती.

व्याख्यात्या बोके म्हणाल्या, इतिहासकाळात जिजाऊ, सावित्री, रमाई, मैत्री, गार्गी अशा महानायिकांनी महिलांचा इतिहास कर्तृत्वाने उज्ज्वल केला आहे. सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या विरोधात जावून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, पण आपण आज त्यांच्या कार्याची जाणीव विसरलो आहोत. भारतात चेंडू उडविणाऱ्यांना व गाणे म्हणणाऱ्यांना भारतरत्न दिला जातो. पण सावित्रीबाई फुलेंना दिला जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. महिलांनी मनाच्या गुलामगिरीतून बाहेर आले पाहिजे, स्त्रियांमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे. याची जाणीव स्त्रियांनी ठेवणे गरजेचे आहे. स्त्री कधीही स्वत:साठी जगली नाही. ती कायम कुटुंब, समाजासाठी जगत असते. त्यामुळे स्त्रियांनी स्व:हित पाहत आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवास, तापास, कर्मकांड, अंधश्रध्देला बळी न पडता विज्ञानवादी जीवन जगले पाहिजे. जिजाऊ -सावित्रींचा वसा पुढे चालवायचा असेल तर संविधानाने दिलेले हक्क व अधिकार स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा शिंदे, अनुराधा पवार-गायकवाड, जिजाऊवंदना उमाताई जगताप, प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा राजश्रीताई क्षीरसागर, व्याख्यात्यांचा परिचय सुषमाताई देशमुख तर वृषालीताई पाटील यांनी आभार मानले.