शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कर्मकांडाच्या अवडंबरातून स्त्रियांनी बाहेर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. ...

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. या संघर्षातून महिलांनी प्रेरणा घेवून विज्ञानवादी जगात जगणे गरजेचे आहे, पण आजही २१ व्या शतकातील स्वत:ला सुशिक्षित समजणाऱ्या अनेक महिला कर्मकांडात बुडालेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर महिलांनी यातून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन व्याख्यात्या सीमाताई बोके यांनी केले. यंदा कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजवर व्याख्यानाचे प्रसारण करण्यात आले. तत्पूर्वी येथील राजे संभाजी महाविद्यालयात मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीताई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष ज्योतीताई कोथळकर या होत्या. उद्‌घाटक कर सहाय्यक सरिता कदम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सदस्या वंदनाताई आखरे, जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर, प्रायोजक वर्षाताई सरनाईक यांची उपस्थिती होती.

व्याख्यात्या बोके म्हणाल्या, इतिहासकाळात जिजाऊ, सावित्री, रमाई, मैत्री, गार्गी अशा महानायिकांनी महिलांचा इतिहास कर्तृत्वाने उज्ज्वल केला आहे. सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या विरोधात जावून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, पण आपण आज त्यांच्या कार्याची जाणीव विसरलो आहोत. भारतात चेंडू उडविणाऱ्यांना व गाणे म्हणणाऱ्यांना भारतरत्न दिला जातो. पण सावित्रीबाई फुलेंना दिला जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. महिलांनी मनाच्या गुलामगिरीतून बाहेर आले पाहिजे, स्त्रियांमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे. याची जाणीव स्त्रियांनी ठेवणे गरजेचे आहे. स्त्री कधीही स्वत:साठी जगली नाही. ती कायम कुटुंब, समाजासाठी जगत असते. त्यामुळे स्त्रियांनी स्व:हित पाहत आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवास, तापास, कर्मकांड, अंधश्रध्देला बळी न पडता विज्ञानवादी जीवन जगले पाहिजे. जिजाऊ -सावित्रींचा वसा पुढे चालवायचा असेल तर संविधानाने दिलेले हक्क व अधिकार स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा शिंदे, अनुराधा पवार-गायकवाड, जिजाऊवंदना उमाताई जगताप, प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा राजश्रीताई क्षीरसागर, व्याख्यात्यांचा परिचय सुषमाताई देशमुख तर वृषालीताई पाटील यांनी आभार मानले.