शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

कोरोना लसीकरणात महिला पुरुषांपेक्षा मागेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST

हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये ...

हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातच चार ते साडेचार लाख लोकसंख्या असून सध्या त्यांनाच लसीकरणाला परवानगी नाही. मात्र, उर्वरित लोकसंख्या ही ५० टक्के आहे. त्यांनाच अधिक धोका असल्याने त्यांनी लसीकरण करून घेणे जास्त गरजेचे आहे. यासाठी वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील जनता सध्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. शहरी भागातील जनता सुज्ञ असूनही वेगवेगळ्या अफवांना बळी पडत असल्याचे दिसत आहे. त्यातच मागील आठ दिवसांत नाणे अंगाला चिटकण्याचे एक-दोन प्रकार समोर आले आणि उरला-सुरला उत्साहही संपल्याचे दिसत आहे. दुसरीकडे तीन व्हायलही संपत नसल्याने लसीचे डोस तसेच पडून राहण्यापेक्षा तरुणांना लस देण्याची वेळ या केंद्रांवर येत आहे. काही केंद्रांवर तर नंतर हे व्हायल वायाच जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा कहर संपला, असे न समजता लसीकरण करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

ही लस घेतल्यावर ताप येतो, अशक्तपणा येतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे लस घेण्याची भीती वाटत आहे. मात्र, ती लवकरच घेणार आहे.

-केशव घनतोडे, केंद्रा बु.

आता शेताची कामे सुरू आहेत. ताप आला तर कामे बुडतील म्हणून लस घेतली नाही. आधी ही लस मिळत नव्हती म्हणून घेता आली नाही.

-पंचफुलाबाई मुधळकर, मोप

ही लस घेतलेल्यांना नंतर ताप आला. काहीजण आजारी पडले. त्यामुळे ही लस घेण्यासाठी भीती वाटत आहे. त्यामुळे लस घेतली नाही.

-पुण्यरथाबाई पठाडे, कानडखेडा बु.