शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

‘ती’ तहकूब सभा होणार तरी कधी?; हिंगोली जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:58 IST

हिंगोली जिल्हा परिषदेत सभापती निवडीनंतर त्यांना खातेवाटप करण्याची बैठक ३ फेब्रुवारी रोजी होती.

ठळक मुद्देअध्यक्षांची दमछाक, आठ समित्यांचा भार

हिंगोली :  जिल्हा परिषदेच्या खातेवाटप सभेतील गोंधळामुळे तहकूब झालेली सभा आता कधी होणार? यावर चर्चा झडू लागली आहे. तर शिवसेनेचा एकही सभापती खातेवाटपात शिल्लक नसतानाही हा प्रकार घडण्यामागचे कारण काय? असा सवालही केला जात आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेत सभापती निवडीनंतर त्यांना खातेवाटप करण्याची बैठक ३ फेब्रुवारी रोजी होती. मात्र त्यात शिवसेनेने ठरविल्याप्रमाणे सगळे होत नसल्याने ही सभाच गोंधळाच्या कारणावरून जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांनी तहकूब केली. तोपर्यंत जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे यांना बांधकाम व आरोग्य समिती देण्यास सभागृहाने संमती दिली होती. शिक्षण व अर्थ समितीवर ऐनवेळी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांनी दावा सांगितला. त्यांना माजी खा.राजीव सातव यांच्या सात जणांच्या गटाची तर साथ होतीच शिवाय राष्ट्रवादीतील मंडळीही बहुसंख्येने पाठीशी उभी राहताना दिसत होती. तर भाजपचे ११, अपक्षांसह शिवसेनेतही चव्हाण यांच्यासोबत राहणारी मोठी मंडळी होती. त्यामुळे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाचे बाजीराव जुमडे यांना कृषी व पशुसंवर्धन समितीशिवाय पर्याय उरत नसल्याचे चित्र दिसत होते.

शिवसेनेने सभापती निवडीच्या वेळी ज्या गोरेगावकर गटाच्या भरवशावर एवढी खेळी केली. समाजकल्याण सभापतीपद पदरात पाडून घेतले, त्या गोरेगावकर गटाच्या हाती आपल्यामुळेच धुपाटणे येत असल्याने शिवसेनेतील वरिष्ठ नाराज होत होते. मात्र त्यांना अजूनही हा तिढा सोडविता आला नसल्याने आता सेनेचा हा एकप्रकारे पराभवच असल्याचे मानले जात आहे. शिवाय या सर्व प्रकारात एकूण आठ समित्यांचा कारभार पाहताना जि.प.अध्यक्ष बेले यांची दमछाक होत आहे. आखरे यांच्या समितीचा ठराव झाला तरीही त्याचे अनुपालन नसल्याने त्यांना अजून बांधकाम व आरोग्य समिती सांभाळता येत नाही. 

अध्यक्षांची दमछाक, आठ समित्यांचा भारशिक्षण व अर्थ तसेच कृषी व पशुसंवर्धनवरूनच तिढा निर्माण झालेला असल्याने ही खातीही अध्यक्षांकडेच आहेत. तर अध्यक्षांना स्थायी व जलसंधारण या दोन महत्त्वपूर्ण समित्यांचा कारभार सांभाळावा लागतो. त्यामुळे एवढ्या समित्यांच्या कारभारात बेले यांची दमछाक होत आहे. सध्या कोणतेच नियोजन नसले तरीही या समित्यांच्या बैठकांना वेळ देणेही क्रमप्राप्त ठरत आहे. ४शिवसेनेकडे असलेल्या दोन सभापतीपदांना थेट खातेच मिळाले आहे. समाजकल्याण सभापतीपदी फकिरा मुंडे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रुपाली पाटील गोरेगावकर यांची निवड झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातच अख्खी जिल्हा परिषद ठेवण्यासाठीच हा डाव आखल्याचा आरोपही आता होत आहे. अध्यक्षपदही सेनेकडे असल्याने या आरोपात तथ्यही वाटत असले तरीही महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचा सेनेने फायदा उचलला व पुढेही असेच सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदShiv Senaशिवसेना