शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

हिंगोली : थेट जनतेतून सरपंचाची होणारी निवड रद्द करण्याबरोबरच पूर्वीचे आरक्षणही रद्द केले असून त्यामुळे अनेक गावांत लोकसंख्येच्या निकषानुसारचे ...

हिंगोली : थेट जनतेतून सरपंचाची होणारी निवड रद्द करण्याबरोबरच पूर्वीचे आरक्षणही रद्द केले असून त्यामुळे अनेक गावांत लोकसंख्येच्या निकषानुसारचे आरक्षण असतानाही पद गेले अन् गावात सदस्यही या प्रवर्गातून निवडून येणार नसल्याची ओरड वाढली आहे. अनेक सरपंच आधी आरक्षण जाहीर करण्याची मागणी करीत आहेत.

सरपंचपदाचे आरक्षण आधीच जाहीर झाले तर योग्य व सक्षम उमेदवार देणे शक्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवाय जेथे आधी आरक्षण जाहीर झाले होते. त्यात अनेक ठिकाणी ज्या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाले होते, त्यासाठी सदस्यपद मात्र आरक्षित राहिले नव्हते. जसे- कळमनुरी तालुक्यात दाती, शेवाळा, रेडगाव या ठिकाणचे सरपंचपद एसटी प्रवर्गाला सुटले होते. तर गावात इतर एकही सदस्यपद या प्रवर्गाला नाही. काही ठिकाणी आरक्षण नसल्याने अल्पसंख्येत असलेल्या या समाजाला सर्वसाधारणमधून निवडून येणे शक्य नाही. तर भविष्यात पुन्हा सरपंचपद एसटीला सुटले तर रिक्त राहू शकते. औंढा तालुक्यात माथा, पुरजळ, चिमेगाव, रुपूर, जडगावला हेच चित्र आहे.

हा प्रकार चुकीचा

शासनाने आधी काढलेले आरक्षण रद्द केले. आता पुढे कोणत्या प्रवर्गाला सुटणार हे माहिती नाही. त्यामुळे आधीच सक्षम उमेदवार देवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणे शक्य होणार नाही. शिवाय, बहुमत एकीकडे व आरक्षणाचा उमेदवार एकीकडे असा प्रकार होवू शकतो. शासनाने आधीच आरक्षण काढले पाहिजे.

- संजय कुटे, सरपंच, माथा

पॅनलप्रमुखच कारभारी बनतील

शासनाने आधीच आरक्षण जाहीर केले तर योग्य व सक्षम उमेदवार देता येतो. शिवाय, असे उमेदवार स्वत: पुढे येत नाहीत. मात्र, आता सगळी अनिश्चितता आहे. पॅनलप्रमुखच कारभारी राहणार आहेत. शासनाने जाणीवपूर्वक हा प्रयोग केल्याचे दिसत असून तो चुकीचा आहे.

- मंगेश पडोळे,

उपसरपंच माथा

...तर जागा रिक्त राहण्याचा धोका

शासनाने यापूर्वी काढलेल्या आरक्षणात शेवाळा, दातीसारख्या गावांचे सरपंचपद एसटीसाठी राखीव होते. मात्र, ग्रा. पं. सदस्याचे एकही पद येथे राखीव नाही. पुढे पुन्हा याच प्रवर्गाला सरपंचपद सुटले तर रिक्त राहण्याचा धोका आहे. तो आदिवासींवर अन्याय आहे.

- अमिता भुरके

पं. स. सदस्या, दाती

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

शासनाला गावपातळीवर असलेल्या अडचणीच लक्षात येत नाहीत. हे या निर्णयावरून दिसते. थेट जनतेतून सरपंचाचा निर्णय रद्द करताना आरक्षण तत्काळ पुन्हा काढण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते.

पॅनल निवडताना पुढच्या आरक्षणाचा विचार कसा करायचा?

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षण तर कधी थेट जनतेतून अशी अट टाकून नाहक अडचणीत आणण्याचे काम केले जाते. आता २५ वर्षांनंतर आरक्षण नंतर काढण्याचा निर्णयही तोच प्रकार आहे.