शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

हिंगोली : थेट जनतेतून सरपंचाची होणारी निवड रद्द करण्याबरोबरच पूर्वीचे आरक्षणही रद्द केले असून त्यामुळे अनेक गावांत लोकसंख्येच्या निकषानुसारचे ...

हिंगोली : थेट जनतेतून सरपंचाची होणारी निवड रद्द करण्याबरोबरच पूर्वीचे आरक्षणही रद्द केले असून त्यामुळे अनेक गावांत लोकसंख्येच्या निकषानुसारचे आरक्षण असतानाही पद गेले अन् गावात सदस्यही या प्रवर्गातून निवडून येणार नसल्याची ओरड वाढली आहे. अनेक सरपंच आधी आरक्षण जाहीर करण्याची मागणी करीत आहेत.

सरपंचपदाचे आरक्षण आधीच जाहीर झाले तर योग्य व सक्षम उमेदवार देणे शक्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवाय जेथे आधी आरक्षण जाहीर झाले होते. त्यात अनेक ठिकाणी ज्या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाले होते, त्यासाठी सदस्यपद मात्र आरक्षित राहिले नव्हते. जसे- कळमनुरी तालुक्यात दाती, शेवाळा, रेडगाव या ठिकाणचे सरपंचपद एसटी प्रवर्गाला सुटले होते. तर गावात इतर एकही सदस्यपद या प्रवर्गाला नाही. काही ठिकाणी आरक्षण नसल्याने अल्पसंख्येत असलेल्या या समाजाला सर्वसाधारणमधून निवडून येणे शक्य नाही. तर भविष्यात पुन्हा सरपंचपद एसटीला सुटले तर रिक्त राहू शकते. औंढा तालुक्यात माथा, पुरजळ, चिमेगाव, रुपूर, जडगावला हेच चित्र आहे.

हा प्रकार चुकीचा

शासनाने आधी काढलेले आरक्षण रद्द केले. आता पुढे कोणत्या प्रवर्गाला सुटणार हे माहिती नाही. त्यामुळे आधीच सक्षम उमेदवार देवून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणे शक्य होणार नाही. शिवाय, बहुमत एकीकडे व आरक्षणाचा उमेदवार एकीकडे असा प्रकार होवू शकतो. शासनाने आधीच आरक्षण काढले पाहिजे.

- संजय कुटे, सरपंच, माथा

पॅनलप्रमुखच कारभारी बनतील

शासनाने आधीच आरक्षण जाहीर केले तर योग्य व सक्षम उमेदवार देता येतो. शिवाय, असे उमेदवार स्वत: पुढे येत नाहीत. मात्र, आता सगळी अनिश्चितता आहे. पॅनलप्रमुखच कारभारी राहणार आहेत. शासनाने जाणीवपूर्वक हा प्रयोग केल्याचे दिसत असून तो चुकीचा आहे.

- मंगेश पडोळे,

उपसरपंच माथा

...तर जागा रिक्त राहण्याचा धोका

शासनाने यापूर्वी काढलेल्या आरक्षणात शेवाळा, दातीसारख्या गावांचे सरपंचपद एसटीसाठी राखीव होते. मात्र, ग्रा. पं. सदस्याचे एकही पद येथे राखीव नाही. पुढे पुन्हा याच प्रवर्गाला सरपंचपद सुटले तर रिक्त राहण्याचा धोका आहे. तो आदिवासींवर अन्याय आहे.

- अमिता भुरके

पं. स. सदस्या, दाती

सरपंच परिषदेचे काय म्हणणे?

शासनाला गावपातळीवर असलेल्या अडचणीच लक्षात येत नाहीत. हे या निर्णयावरून दिसते. थेट जनतेतून सरपंचाचा निर्णय रद्द करताना आरक्षण तत्काळ पुन्हा काढण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते.

पॅनल निवडताना पुढच्या आरक्षणाचा विचार कसा करायचा?

सरपंचाला कधी अपत्याची अट, कधी शिक्षण तर कधी थेट जनतेतून अशी अट टाकून नाहक अडचणीत आणण्याचे काम केले जाते. आता २५ वर्षांनंतर आरक्षण नंतर काढण्याचा निर्णयही तोच प्रकार आहे.