शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

दलित वस्तीच्या निधीवरून संघर्ष कुणाशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्यांशी? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्यांशी? असा सवाल केला जात आहे.दलित वस्ती सुधार योजनेत ग्रामपातळीवर निधी देण्यास मोठा वाव आहे. मात्र ही योजना व तिचे नियोजन जि.प.तच होते. त्यामुळे जि.प. सदस्यांनी सुचविलेलीच कामे होतात. मात्र मागच्या वर्षी पालकमंत्र्यांसह आमदारांनीही या योजनेत त्यांच्याकडे गाºहाणी मांडणाऱ्या गावांत निधी देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. हे घडत नसल्याने मग तक्रारींचा पाढा सुरू झाला होता. यात जि.प.सदस्यांनी तर नियोजनात पालकमंत्र्यांच्या शिफारसींनाही मान दिल्याचे सांगून आता कामे थांबण्याचा प्रकार कसा काय घडतोय? असा सवाल करणे सुरू केले आहे. पालकमंत्रीही भाजपचेच आणि तक्रारकर्ते आमदारही त्याच पक्षाचे. विशेष म्हणजे मंत्री त्याच समाजकाल्याण खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे या कामांना खोडा घालण्याचा होत असलेला प्रयत्न त्यांनीच हाणून पाडला पाहिजे, अशीही चर्चा व्हायला लागली आहे. सरपंच मंडळीने यात हातपाय हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आता जि.प.सदस्यांकडे ही मंडळी चकरा मारू लागल्याने त्यांनीही नाहक व बिनबुडाच्या तक्रारींमुळे कामे थांबता कामे नये, अशी भूमिका घेतली असली तरीही पत्र मुख्यमंत्र्यांचे असल्याने प्रशासन पुढे जायला तयार नाही. यात कदाचित आमदार व पालकमंत्र्यांत हा शिफारशींवरूनचा संघर्ष असेल, असाही कयास लावला जात असून त्यात जि.प. प्रशासन व सदस्यांना नाहक वेठीस धरले जात असल्याचे सांगत आहेत. एकंदर हा प्रश्न पुढील काही दिवसांमध्ये चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.एरवी निधी खर्च होत नसल्याचे सांगून पुढील निधी देण्यास आडवणूक केली जाते. आता २६ कोटींची कामे सुरू आहेत. पुढील २0 कोटींचे नियोजन करायचे आहे. मात्र याच कामांना असा खोडा घातला व पुढील निधी कमी मिळाला तर जिल्ह्याचे नुकसान होणार आहे. जेथे काम दर्जाहीन आहे किंवा केलेच नाही व त्याची तक्रार झाली तर समजण्यासारखे आहे. मात्र सरसकट कामे बंद करणे चुकीचे असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद