शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या निधीवरून संघर्ष कुणाशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:11 IST

जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्यांशी? असा सवाल केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्यांशी? असा सवाल केला जात आहे.दलित वस्ती सुधार योजनेत ग्रामपातळीवर निधी देण्यास मोठा वाव आहे. मात्र ही योजना व तिचे नियोजन जि.प.तच होते. त्यामुळे जि.प. सदस्यांनी सुचविलेलीच कामे होतात. मात्र मागच्या वर्षी पालकमंत्र्यांसह आमदारांनीही या योजनेत त्यांच्याकडे गाºहाणी मांडणाऱ्या गावांत निधी देण्यासाठी प्रयत्न चालविले होते. हे घडत नसल्याने मग तक्रारींचा पाढा सुरू झाला होता. यात जि.प.सदस्यांनी तर नियोजनात पालकमंत्र्यांच्या शिफारसींनाही मान दिल्याचे सांगून आता कामे थांबण्याचा प्रकार कसा काय घडतोय? असा सवाल करणे सुरू केले आहे. पालकमंत्रीही भाजपचेच आणि तक्रारकर्ते आमदारही त्याच पक्षाचे. विशेष म्हणजे मंत्री त्याच समाजकाल्याण खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे या कामांना खोडा घालण्याचा होत असलेला प्रयत्न त्यांनीच हाणून पाडला पाहिजे, अशीही चर्चा व्हायला लागली आहे. सरपंच मंडळीने यात हातपाय हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आता जि.प.सदस्यांकडे ही मंडळी चकरा मारू लागल्याने त्यांनीही नाहक व बिनबुडाच्या तक्रारींमुळे कामे थांबता कामे नये, अशी भूमिका घेतली असली तरीही पत्र मुख्यमंत्र्यांचे असल्याने प्रशासन पुढे जायला तयार नाही. यात कदाचित आमदार व पालकमंत्र्यांत हा शिफारशींवरूनचा संघर्ष असेल, असाही कयास लावला जात असून त्यात जि.प. प्रशासन व सदस्यांना नाहक वेठीस धरले जात असल्याचे सांगत आहेत. एकंदर हा प्रश्न पुढील काही दिवसांमध्ये चांगलाच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.एरवी निधी खर्च होत नसल्याचे सांगून पुढील निधी देण्यास आडवणूक केली जाते. आता २६ कोटींची कामे सुरू आहेत. पुढील २0 कोटींचे नियोजन करायचे आहे. मात्र याच कामांना असा खोडा घातला व पुढील निधी कमी मिळाला तर जिल्ह्याचे नुकसान होणार आहे. जेथे काम दर्जाहीन आहे किंवा केलेच नाही व त्याची तक्रार झाली तर समजण्यासारखे आहे. मात्र सरसकट कामे बंद करणे चुकीचे असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद