शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची संख्या वाढली असताना २९१ 'ग्रा.पं.'मध्ये राेहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

गावातच मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची कामासाठी भटकंती होऊ नये म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. ...

गावातच मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांची कामासाठी भटकंती होऊ नये म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सिंचन विहीर, तलाव, घरकुल बांधकाम, वृक्षारोपण, बंधारा उभारणे आदी कामे मजुरांना उपलब्ध करून दिली जातात. सध्या ग्रामपंचायतींनी कामाची मागणी केल्यास तत्काळ कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्या २७२ ग्रामपंचायतींनी रोहयो कामाची मागणी केली असून औंढा तालुक्यातील ३९, वसमत ५५, हिंगोली ५७, कळमनुरी ६८ तर सेनगाव तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. एकीकडे काही ग्रामपंचायती रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी जिल्ह्यातील जवळपास २९१ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामेच सुरू नसल्याचे समोर आले आहे. अगोदरच कोरोनामुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने कामगार त्रस्त आहेत. त्यात ग्रामपंचायतीमध्येही रोहयोची कामे सुरू नसल्याने मजूर कामाच्या शोधात असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

औंढा - ६२

वसमत - ६४

हिंगोली - ५४

कळमनुरी- ५७

सेनगाव - ५४

रोहयोवर शून्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती - १२०

सरपंच काय म्हणतात...?

कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे गावातच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे. पाठपुरावा सुरू असून, सर्वांनाच रोजगार मिळाल्यास होणारे स्थलांतर रोखण्यात मदत होईल.

- शोभाबाई नायक, सरपंच, सवना.

गावातच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसा पाठपुरावा सुरू असून, रोहयोची जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांना दिलासा मिळेल.

- धम्मदीक्षा खंदारे, सरपंच केंद्रा बु.

कोरोनामुळे अगोदरच काम मिळत नव्हते. त्यामुळे रोहयोची कामे सुरू होवून हाताला काम मिळेल, असे वाटत् हाेते. मात्र रोहयोची कामे सुरू नसल्याने कामासाठी मुंबईला सहपरिवार यावे लागले.

- अमोल पाईकराव, मजूर.

कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प असताना ग्रामपंचायती रोहयोची कामे उपलब्ध करून देत नाहीत. काही ठिकाणी कामे सुरू असली तरी सर्वांनाच काम मिळत नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून द्यावीत.

- राजू इंगोले, मजूर.

१३ हजार मजुरांच्या हाताला काम

जिल्ह्यात २९१ ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू नसली तरी २७२ ग्रामपंचायतीमध्ये कामे केली जात आहेत. यावर औंढा तालुक्यात १ हजार ६८९, वसमत १ हजार ७८२, हिंगोली ३ हजार ७०५, कळमनुरी ३ हजार ४१७ तर सेनगाव तालुक्यात २ हजार ५३६ मजूर काम करीत आहेत. यामध्ये सर्वाधिक कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत.