शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे ...

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप मोफत धान्य गावांमध्ये पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थींना कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दूध विक्री केंद्र, दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे, तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले अन् धान्यही मिळाले नसल्याने गरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे धान्य अद्याप गावांपर्यंत पोहोचले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मोफत धान्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहेे.

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा

संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?

- प्रताप बलखंडे, साळवा.

संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.

- शिवाजी दराडे, यडूद.

मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत, तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर पातळे, गोरेगाव.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नसल्याचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १८८८७३

रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या

अन्न सुरक्षा १३१८३८

अंत्योदय २६३५९

शेतकरी ३०७७६