शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे ...

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप मोफत धान्य गावांमध्ये पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थींना कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दूध विक्री केंद्र, दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे, तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले अन् धान्यही मिळाले नसल्याने गरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे धान्य अद्याप गावांपर्यंत पोहोचले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मोफत धान्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहेे.

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा

संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?

- प्रताप बलखंडे, साळवा.

संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.

- शिवाजी दराडे, यडूद.

मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत, तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर पातळे, गोरेगाव.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नसल्याचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १८८८७३

रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या

अन्न सुरक्षा १३१८३८

अंत्योदय २६३५९

शेतकरी ३०७७६