शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे ...

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप मोफत धान्य गावांमध्ये पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थींना कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दूध विक्री केंद्र, दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे, तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले अन् धान्यही मिळाले नसल्याने गरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे धान्य अद्याप गावांपर्यंत पोहोचले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मोफत धान्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहेे.

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा

संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?

- प्रताप बलखंडे, साळवा.

संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.

- शिवाजी दराडे, यडूद.

मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत, तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर पातळे, गोरेगाव.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नसल्याचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १८८८७३

रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या

अन्न सुरक्षा १३१८३८

अंत्योदय २६३५९

शेतकरी ३०७७६