शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

रेशनवरील मोफत धान्य गावांमध्ये कधी मिळणार...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे ...

हिंगोली : संचारबंदी काळात गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना रेशनचे धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप मोफत धान्य गावांमध्ये पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थींना कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दूध विक्री केंद्र, दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे, तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले अन् धान्यही मिळाले नसल्याने गरिबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे धान्य अद्याप गावांपर्यंत पोहोचले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे मोफत धान्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहेे.

कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा

संचारबंदीमुळे हातचा रोजगार बुडत आहे. मोफत धान्य देण्याची घोषणा झाली असली तरी जवळपास दोन महिने होत आले तरी अद्याप कोणतेच रेशन मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे?

- प्रताप बलखंडे, साळवा.

संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे कामही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा? घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे.

- शिवाजी दराडे, यडूद.

मोफत धान्य देण्याची घोषणा होऊन पंधरा दिवस होत आले आहेत, तसेच संचारबंदीची मुदतही संपत आली आहे. तरी अद्याप मोफत धान्य मिळाले नाही. घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

- ज्ञानेश्वर पातळे, गोरेगाव.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नसल्याचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

एकूण रेशनकार्डधारकांची संख्या- १८८८७३

रेशनकार्डचा प्रकार रेशनकार्डधारकांची संख्या

अन्न सुरक्षा १३१८३८

अंत्योदय २६३५९

शेतकरी ३०७७६