शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

उद्योगांचे चाक मंदावले : कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन सुरू केले आहे. अनेक क्षेत्रावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून औद्योगिक क्षेत्राला मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरूही झाल्या आहेत. मात्र कंपनीला पुरविला जाणारा कच्चा माल आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच एखाद्या मशीनचा पार्ट बदलायचा म्हटला तरी इतर दुकाने बंद असल्याने मोठी अडचण येत आहे. त्यामुळे कंपनी बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे. काही कंपन्यांनी उत्पादन सुरू ठेवले असले तरी बाहेर मालाला उठाव नसल्याने मालाचे उत्पादन तरी कशाला करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प पडला आहे. एकीकडे उद्योग ठप्प पडत असताना दुसरीकडे मात्र मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक मजुरांच्या हाताला काम नसल्याने हतबल झाले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुरू उद्योग

हिंगोली -३५

वसमत - १२

कळमनुरी - २

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

ब्रेक द चेनमध्ये औद्योगिक वसाहती सुरू असल्या तरी उत्पादित मालाला बाहेर उठाव नाही. त्यात कच्चा माल आणताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहेत. कामगारांनाही काम मिळत नाही. मालाची विक्री होत नसतानाही बँक मात्र हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहे.

- रमेश पंडीत, उद्योजक

औद्योगिक वसाहती सुरू रहाव्यात, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र ब्रेक द चेनमुळे बाजारपेठेत बंधने आहेत. कंपनीतील मशीनचा एखादा पार्ट आणायचा असला तरी बाजारपेठ बंद असल्याने आणता येत नाही. कच्चा मालही आणताना अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका कामगारांनाही बसत आहे.

-आर. एस. केदार,

उपअभियंता, एमआयडीसी, उपविभाग परभणी

कच्चा माल मिळण्यात अडचणी

हिंगोली जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योग फार मोठे नाहीत. त्यामुळे माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल इतर जिल्ह्यातून मागवावा लागतो. शिवाय मशीनचे पार्टही येथे मिळत नाहीत. कच्चा माल मिळाला तरी आणायचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या बहुतांश मोठ्या शहरात ब्रेक द चेनमुळे संचारबंदी लागू आहे. यामुळेच अडचणीत भर पडत आहे.

कामगारांच्या प्रतिक्रिया

औद्योगिक वसाहत सुरू असली तरी बहुतांश उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कंपन्या सुरू असल्या तरी तेथे पोहचायचे कसे? ये-जा कशी करायची ?

-अंकुश पंडित

शासनाने औद्योगिक वसाहत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र कच्चा माल मिळत नसल्याने कंपनी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

-अरुण वाढवे