शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:20 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे हिंगोलीत आगमन होणार असल्याने मिरवणुकीची आधीपासूनच जय्यत तयारी सुरु होती. हिंगोली शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपतींचा पुतळा दाखल झाला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.हिंगोली शहरातील अग्रेसन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट आॅफीस, विश्रामगृह, नियोजित पुतळ्याचे ठिकाण या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध धर्माचे समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यात पुतळ्याचे आगमन होताच डोंगरकडा, वारंगाफाटा, आखाडाबाळापूर, पार्डी मोड यासह विविध मार्गावरून पुतळ्याचे आगमन होताच शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. हिंगोलीत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. अखेर यावर्षी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जात आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध कारागीर संताजी चौगुले यांनी हा पुतळा तयार केला आहे. आकर्षक असा शिवरायांचा हा पुतळा ब्रॉंझचा आहे. कोल्हापूर येथून हा पुतळा हिंगोलीकडे आणण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज