शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ओला चारा आणला, तसाच घरी न्यावा लागतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मागील चार दिवसांपासून टाळेबंदी लागू केली आहे. पशुपालक ओला ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मागील चार दिवसांपासून टाळेबंदी लागू केली आहे. पशुपालक ओला चारा खरेदीसाठी येत नसल्यामुळे रानावनातून गोळा करून आणलेला ओला चारा सायंकाळ झाली की परत नेण्याची वेळ छोट्या विक्रेत्यांवर आली असून, लेकराबाळांना उपाशीपोटीच रहावे लागत आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने आजमितीस मार्च महिना सुरू झाला असला, तरी ओला चारा मिळू लागला आहे. सकाळ झाली की, रानावनातून ओला चारा गोळा करून शहराच्या ठिकाणी विक्रीला आणला जातो. ओला चारा विक्रीतून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवत कुटुंबाचा गाडा हाकला जातो. परंतु, मागील चार दिवसांपासून मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गोळा करून आणलेला चारा पशुपालक खरेदीसाठी येत नसल्यामुळे

परत न्यावा लागत आहे. जिल्ह्यातील आजूबाजूच्या दहा ते पंधरा खेड्यांतील छोटे विक्रेते रानावनातून ओला चारा गोळा करून शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. शहरातील इंदिरा चौक, गांधी चौक, रिसाला बाजार, खटकाळी बायपास, औंढारोड आदी मोक्याच्या ठिकाणी हे विक्रेते ओला चारा घेऊन बसतात. परंतु, कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे. कोरोना आजार वाढू नये म्हणून प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला असला, तरी छोट्या विक्रेत्यांची मात्र उपासमार होताना दिसून येत आहे. शेळी, गाय, बैल, म्हैस, घोडे, मेंढी आदी पशुपालक रोज चारा छोट्या विकेत्यांकडून घेऊन जातात. कडब्याचे भाव २ हजार ते २ हजार २०० असे असल्यामुळे पशुपालकांना कडबा घेणे परवडत नाही. त्यामुळे ते सकाळच्यावेळेला छोट्या विक्रेत्यांकडून ओला चारा विकत नेतात. ओला चाऱ्याची किंमत १५ रुपये पेंडी असली, तरी पशुपालकांनी जास्त प्रमाणात पेंडी घेतल्यास त्याचा भावही कमी केला जातो, असे विक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनामुळे होताहेत गरिबांचे हाल

दहा-बारा वर्षांपासून ओला चारा शहराच्या ठिकाणी आणून त्यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा हाकतो आहे. मागच्यावर्षी पाच महिने उपाशीपोटी राहण्यातच गेले. घरात लहान-मोठे सहा सदस्य आहेत. चार दिवसांपासून अर्धपोटीच राहण्याची वेळ आली आहे. दिवसाकाठी चारशे रुपये मिळायचे. परंतु, सध्या शंभर रुपयेच पदरात पडत आहेत. भाजीपाला, किराणा दुकान उघडे नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हा गरिबांना आर्थिक मदत करावी.

- सदानंद यादव, ओला चारा विक्रेता, राहोली

फोटो