शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

उधळीचा फटका, तूर उत्पन्नात प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

गोरेगाव : गोरेगावसह परिसरात सध्या तूर काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. उधळीचा फटका बसलेल्या तूर उत्पादनात प्रचंड घट होताना ...

गोरेगाव : गोरेगावसह परिसरात सध्या तूर काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. उधळीचा फटका बसलेल्या तूर उत्पादनात प्रचंड घट होताना दिसत आहे. खडकाळ जमिनीवरील तूर पीक तर रोगराईच्या घाल्यामुळे पूर्णपणे वाळून गेले. काही शेतकऱ्यांच्या पदरात केवळ तुराट्याच उरल्याचे वास्तव चित्र आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पन्नास फटका बसला असताना जोमात असलेल्या तुरीच्या उत्पन्नातून खरीप हंगामातील लागवड खर्च तरी निघेल, अशी आशा होती; परंतु तूर उत्पन्नात झालेल्या घटीने हातावर तुरी दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि कोरडे धुके त्यातच जमिनीतील बुरशीच्या प्रार्दुभावामुळे फुले आणि शेंगधारणेच्या अवस्थेतील सुमारे ६० टक्के तुरीचे पीक उधळून गेले असताना उत्पन्नात मोठी घट होत आहे. एकरी पाच ते सात किंटल उत्पन्नाची अपेक्षा असताना चांगल्या प्रतीच्या सुपीक शेतजमिनीत केवळ एक ते अडीच क्विंटलचा उतारा येत असल्याचे चित्र असून, कमी उत्पन्नामुळे मजूर तूर काढणीचे गुत्ते घेण्याचे टाळत आहेत. त्यांच्याकडून रोख रोजंदारीच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याने शेतकऱ्यांना काढणीसाठी मजुरी खर्चाचा शिल्लक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर काही कोरडवाहू माळरान शेतजमिनीवरील तूर पीक उधळीच्या घाल्यामुळे पूर्णत: वाळून गेले असताना शेतात फक्त तुराट्याच शिल्लक राहिल्याचे वास्तव बघता नापिकीच्या फटक्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रीया.

उधळीमुळे तूर पीक करपल्याने नाममात्र शेंगा शिल्लक राहल्या असून, सर्वत्र नुसत्या तुराट्याच दिसत आहेत. आठ एकर जमिनीत दरवर्षी २० ते २२ पोते उत्पन्न होत असताना यंदा फक्त साडेतीन पोतेच उत्पन्न झाले आहे.

संजय भुरभुरे

गोटवाडी शेतकरी

फोटो नं. ५