शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

पाणंद रस्ता करण्याची मागणी बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी ...

पाणंद रस्ता करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व शेतमजुरांतून होत आहे. सध्या असलेला पाणंद रस्ता हा फार बिकट झालेला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरांना शेताकडे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंगोली : शहरानजीक असणाऱ्या बळसोंड येथील स्टेट बँकेच्या समोरील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अनेक वाहनधारकांना आपले वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डा चुकवितांना वाहनधारक पडत असल्याचे प्रकारही घडत आहे. यासाठी रस्त्यावरील खड्डे दुरूस्त करावे अशी मागणी होत आहे.

शाळेच्या पाठीमागे उकीरडा

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर अनेक गावकरी केरकचरा टाकीत आहे. यामुळे याठिकाणी उकीरडा निर्माण झाला आहे. आता शाळा सुरू झाल्या असून याचा त्रास शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना होत आहे. यासाठी हा उकीरडा साफ करावा अशी मागणी पालकांतून होत आहे.

रानडुकरांचा उपद्रव वाढला

जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ शेतशिवारात रानडुकरांचा वावर वाढला आहे. अनेकदा शेतकरी व शेतमजुर काम करीत असताना शेतात रानडुक्कर आढळत आहेत. या रानडुकरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना अनेकदा ते शेतकरी व शेतमजुरांच्या अंगावर धावत आहे. यामुळे शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कामाच्या शोधात मजुरांचे स्थलांतर

नंदगाव : सध्या गाव व परिसरामध्ये कोणतेही काम मिळत नसल्यामुळे अनेक मजुरांचे कामाच्या शोधात परगावी स्थलांतर होत आहे. कोरोना महामारीमुळे महागाई वाढली असून जेमतेम मिळणाऱ्या पैसातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे अनेक मजूर औरंगाबाद, मुंबई, वसई, पुणे व इतरत्र ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.

हळदीवर करपा रोगाची लागण

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे पाने पिवळी पडून करपत असल्याचे दिसत आहे. यामुळे हळद पिकावर आलेल्या करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने त्वरीत मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पथदिवे दुरूस्त करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा व पिंपरखेड गावातील पथदिवे मागील आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे गावात सायंकाळपासूनच अंधारमय वातावरण निर्माण होत आहे. याचबरोबर गावात अंधार राहत असल्याने भुरटे चोरटे शेतीपयोगी साहीत्य व संसारोपयोगी साहित्य चोरी करीत आहेत. यामुळे पथदिवे दुरुस्त करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.

वाळू अभावी घरकुलांचे कामे खोळंबली

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक नागरिकांना घरकूल मंजुर झालेली आहेत. पण वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे शहरात वाळू मिळत नाही. यामुळे अनेक घरकुलधारकांचे घराचे स्वप्न भंग झाले आहेत. यासाठी वाळू घाटांचा लिलाव व्हावा अशी मागणी घरकूल लाभधारकांतून होत आहे.

बसस्थानकात खाजगी वाहनांमुळे अडथळा

हिंगोली : शहरातील नवीन बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. पण पर्यायी करण्यात आलेल्या बसस्थानक परिसरात ऑटो, कार व इतर खाजगी वाहनांचा वावर होत आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या बसेसना या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. यासाठी संबंधीतांनी लक्ष देवून खाजगी वाहनांना बसस्थानकात घुसू देवू नये अशी मागणी बसचालकांतून होत आहे.