शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:42 IST

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष्ठांचे आदेशच न मिळाल्याने एकाही गावात ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष्ठांचे आदेशच न मिळाल्याने एकाही गावात ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.महावितरणकडून ग्रामीण भागात वीजपुरवठा करताना वीजेसंबधी येणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, वीजेमुळे होणाºया दुर्घटना रोखता याव्यात व ग्रामस्थांना सुरळीत वीज पुरवठा केला जावा यासाठी तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविद्युत सेवक नियुक्तचा निर्णय ग्राम विकास व ऊर्जा विभागाने घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ५६३ पैकी तीन हजार लोकसंख्या असलेल्या ५१३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी महावितरणकडे १८० ग्रामपंचायतीनीं ठराव घेऊन पात्र ग्रामविद्युत सेवकांचे प्रस्ताव महावितरणकडे पाठविले आहेत. परंतु महावितरणकडून अद्याप एकाही ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शासनाकडून निकष पूर्ण करणाºया सेवकांना नियुक्तीच्या सूचना असल्या तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची प्रतिक्षा प्रस्ताव सादर केलेल्या सेवकांना आहे. ही प्रक्रिया संथपणे होत असल्यामुळे एकाही सेवकाची नियुक्ती नाही.दहावी उतिर्ण व आयटीआयमधून विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल या विषयात शिक्षण घेतलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचयातींना पात्रताधारक उमेदवारच मिळाले नाहीत. तर १८० ग्रा. पं. ने ठराव घेऊन सेवकांचे प्रस्ताव महावितणकडे पाठविले तरी नियुक्ती मात्र होईना.हिंगोलीत तीन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या १०२ पैकी २१ ग्रामपंचायतींनी महवितरणकडे ग्रामविद्युत सेवकांचा ठराव पाठविला. तर ८१ मध्ये पात्र उमेदवारच मिळाले नाही. कळमनुरी ११४ पैकी ६१ ग्रा.पं.ने प्रस्ताव पाठविले. तर ५३ ग्रा. पं. ना उमेदवारच मिळाले नाहीत. वसमत तालुक्यात १०८ पैकी ३४ ग्रां.प.चे प्रस्ताव आहेत. तर ७४ मध्ये उमेदवार मिळाले नाहीत. औंढ्यात ९४ पैकी ३८ प्रस्ताव पाठविले, तर ५६ ग्रा.पं. ना उमेदवार मिळाले नाहीत. सेनगाव तालुक्यातील ९५ पैकी २६ ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविले असून ६९ ग्रा. पं. ना उमेदवार मिळालेच नाही.महावितरणकडे प्राप्त ग्रामविद्युत सेवकांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू आहे. वरिष्ठांचे आदेश मिळताच पुढील प्रक्रिया पार पाडून सेवकांना नियुक्तीचे आदेश दिले जातील. अधीक्षक अभियंता जाधव

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण