शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:42 IST

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष्ठांचे आदेशच न मिळाल्याने एकाही गावात ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष्ठांचे आदेशच न मिळाल्याने एकाही गावात ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.महावितरणकडून ग्रामीण भागात वीजपुरवठा करताना वीजेसंबधी येणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, वीजेमुळे होणाºया दुर्घटना रोखता याव्यात व ग्रामस्थांना सुरळीत वीज पुरवठा केला जावा यासाठी तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविद्युत सेवक नियुक्तचा निर्णय ग्राम विकास व ऊर्जा विभागाने घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ५६३ पैकी तीन हजार लोकसंख्या असलेल्या ५१३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी महावितरणकडे १८० ग्रामपंचायतीनीं ठराव घेऊन पात्र ग्रामविद्युत सेवकांचे प्रस्ताव महावितरणकडे पाठविले आहेत. परंतु महावितरणकडून अद्याप एकाही ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शासनाकडून निकष पूर्ण करणाºया सेवकांना नियुक्तीच्या सूचना असल्या तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची प्रतिक्षा प्रस्ताव सादर केलेल्या सेवकांना आहे. ही प्रक्रिया संथपणे होत असल्यामुळे एकाही सेवकाची नियुक्ती नाही.दहावी उतिर्ण व आयटीआयमधून विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल या विषयात शिक्षण घेतलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचयातींना पात्रताधारक उमेदवारच मिळाले नाहीत. तर १८० ग्रा. पं. ने ठराव घेऊन सेवकांचे प्रस्ताव महावितणकडे पाठविले तरी नियुक्ती मात्र होईना.हिंगोलीत तीन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या १०२ पैकी २१ ग्रामपंचायतींनी महवितरणकडे ग्रामविद्युत सेवकांचा ठराव पाठविला. तर ८१ मध्ये पात्र उमेदवारच मिळाले नाही. कळमनुरी ११४ पैकी ६१ ग्रा.पं.ने प्रस्ताव पाठविले. तर ५३ ग्रा. पं. ना उमेदवारच मिळाले नाहीत. वसमत तालुक्यात १०८ पैकी ३४ ग्रां.प.चे प्रस्ताव आहेत. तर ७४ मध्ये उमेदवार मिळाले नाहीत. औंढ्यात ९४ पैकी ३८ प्रस्ताव पाठविले, तर ५६ ग्रा.पं. ना उमेदवार मिळाले नाहीत. सेनगाव तालुक्यातील ९५ पैकी २६ ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविले असून ६९ ग्रा. पं. ना उमेदवार मिळालेच नाही.महावितरणकडे प्राप्त ग्रामविद्युत सेवकांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू आहे. वरिष्ठांचे आदेश मिळताच पुढील प्रक्रिया पार पाडून सेवकांना नियुक्तीचे आदेश दिले जातील. अधीक्षक अभियंता जाधव

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण