शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना प्रवासी मिळेना, हप्ते फिटेनात, उपसमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत ...

हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत नसल्याने भाडे नाही, अनेक मालकांनी चालक काढून टाकल्याने उपासमार आली. तर काहींचे हप्ते थकल्याने वाहन फायनान्सवाल्यांनी ओढून नेले. उपासमारीत दिवस काढण्याची वेळ आली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जमापुंजी गमावल्यानंतर नेमकेच सावरत असताना दुसरी लाट आली. या लाटेने खाजगी वाहनानेही लोक प्रवास टाळत आहेत. त्यातच ज्यांना निकडीचे काम आहे, त्यांना ई पास मिळत नसल्याने तसा प्रवास करायचा तर नफ्यापेक्षा जास्त दंडच भरावा लागत असल्याने कोणी तसे वाहन न्यायला तयार नाही. तरीही रोज प्रवासी मिळतील या प्रतीक्षेत जि.प.जवळ पार्किंग करून ग्राहकाची प्रतीक्षा करीत शेकडो वाहने उभी राहात आहेत. त्यातही एक ते दोन लिटर डिझेल, पेट्रोल वाया जात आहे. शिवाय ज्यांचे हप्ते थकले अशांना एकतर रोज फायनान्स कंपनीचे बोलणे ऐकावे लागत असून काहींची वाहने ओढून नेली. वरून बाहेर पडल्यावर चहापान्यालाही रक्कम खिशात नसल्याने कुणी ओळखीचे भेटले तर खाली पाहण्याची वेळ येत आहे. काही वाहनचालकांचे पोटच या कामावर असल्याने अशांना वर्गणी करून माल भरून दिल्याचे सांगताना एका वाहनचालकास गहिवरून आले होते. विशेष म्हणजे आम्ही दुर्लक्षित घटक असल्याने कोणतीच मदत आम्हाला मिळाली नाही. हात पसरायची ईच्छाही नाही. मात्र तपासणी करून निकडीच्या काळात ईपासद्वारे लोकांना प्रवास करायला मुभा दिली तरीही आम्ही आमचे जीवन जगू शकू, असे स्वाभिमानाचे बोलही एका चालकाने बोलून दाखविले. त्यातच वाहन बंद पडले तर दुरुस्तीची अडचण होत असल्याचेही सांगण्यात आले.

वाहनेही बंद, गॅरेजलाही दुरुस्ती येईना

एकतर वाहने बंदच असल्याने त्यांची दुरुस्ती निघत नाही. जर दुरुस्ती निघालीच तर सुटे भाग मिळण्यासाठी दुकाने सकाळीच एक दिवसाआड सुरू राहात असल्याने तोपर्यंत वाहन तसेच ठेवावे लागत आहे. यामुळे अनेकांची गॅरेजचालकावर नाराजी येत आहे.

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

ज्यांचे स्वत:चे वाहन नाही. दुसऱ्याच्या वाहनावर आहेत. अशा अनेकांचा रोजगार गेला. दुसरे कामही मिळत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे, असे वाहनचालक संघटनेचे संतोष डुकरे म्हणाले. शिवाय ज्यांना मालकांनी अजूनही कायम ठेवले त्यांना ग्राहकच नसल्याने पगार कसे द्यायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाहने पार्किंगमध्येच

मागील दोन महिन्यांपासून वाहनाला एकदाही भाडे लागले नाही. पार्किंगमध्ये वाहन उभे करून परत नेण्यात डिझेल वाया जात आहे. ई पास मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

-ज्ञानेश्वर गिरी

मागील तीस वर्षांत पहिल्यांदाच चहालाही महाग होण्याची वेळ आली. जीवनाच्या या टप्प्यावर वेगळे कामही करू शकत नाही. कुणाची मदत मिळणार नाही. मात्र ई पास दिली तर आम्ही जगणे तरी सुकर होईल.

-प्रदीप जयस्वाल

आम्हाला वाहन दुरुस्तीची मुभा दिली. मात्र दुकाने बंद राहात असल्याने पार्ट मिळत नाहीत. काही पार्ट वाहतुकीमुळे मिळत नाहीत. तर त्या तुलनेत वाहनेही दुरुस्तीला येत नाहीत.

-तस्लिम पठाण गफ्फार खान पठाण

चारचाकी वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी पूर्वी वेटिंग असायची. आता आम्हालाच एखादे वाहन येते का याची वाट पहावी लागते. त्यातही सुटे भाग मिळत नसल्याने एकाच दुरुस्तीत दोन तीन दिवस जात आहेत.

-इद्रीस खान

कार ९५००

जीप १८००

दुचाकी १५००००

टॅक्सी/ रिक्षा ४५००

ट्रक/ट्रॅक्टर १४०००

रुग्णवाहिका ५६

शहरात वाहने किती १,९५,००००